भरधाव अश्वावर आरूढ होण्याची स्पर्धा आजच्या विज्ञान युगात अव्याहत सुरू आहे. जो तो भौतिक सुखांसाठी प्राण पणाला लावून धावतो आहे आणि परिणामी कमालीचा असुरक्षित, व्याधीग्रस्त, तणावपूर्ण आणि वैफल्यग्रस्त आयुष्य आजचा माणूस जगतो आहे. आजच्या पिढीच्या नशिबी आली आहे अफाट स्पर्धा आणि अवाजवी अपेक्षांचे ओझे… अशावेळी अत्यंत अस्वस्थ, उद्विग्न मनाला शांततेची, सकारात्मकतेची, आशेची आवश्यकता भासते. संकटकाळी जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात, दिशाहीन व्हायला होतं तेव्हा आपण परमेश्वराचे नामस्मरण करतो. परमेश्वर कोणत्या ना कोणत्या रुपात येऊन आपला तारणहार होईल या विश्वासाने, श्रद्धेने आणि भक्तीभावाने. महाराष्ट्राच्या या पवित्र भूमीवर असे अनेक थोर संत होऊन गेले ज्यांनी वाट चुकलेलयांना मार्ग दाखवला, त्यांचे मार्गदर्शक बनले… त्यांच्या दारी आलेल्या भक्तांच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अशाच ब्रह्मांडनायक श्री स्वामी समर्थ ह्यांनी भक्तांना सन्मार्ग दाखवला. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्यही शक्य करतील स्वामी या अमफतमय शब्दांची शक्ती अद्वितीय आहे.
अशाच असाधारण सिध्दपुरुषाचे जीवनचरित्र जय जय स्वामी समर्थ या मालिकेद्वारे प्रेक्षकांना बघण्याची संधी मिळणार आहे. जय जय स्वामी समर्थ 28 डिसेंबरपासून सोमवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता आपल्या कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. शिरीष लाटकर लिखित या मालिकेची निर्मिती पॅम्सक्लब यांनी केली आहे.
आपल्या भवतालच्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर आहे, परमेश्वराच नाव घेत स्वत: परमेश्वर व्हा असे सांगणारे थोर सिद्धपुरुष अठराव्या शतकात होऊन गेले ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. गाणगापुराचे नफसिंह सरस्वती कर्दळीवनात गुप्त झाल्यानंतर तब्बल 300 वर्षांचा काळ उलटला आणि एक दिवस कर्दळीवनात लाकडं तोडणाऱया एका इसमाच्या हातून कुघ्&हाड निसटली आणि तिथल्या वारुळावर पडली. तिथून रक्ताची धार लागली आणि अडसर दूर केल्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकट झाले. इथून खघ्&या अर्थाने प्रवास सुरू झाला. अन्यायाला मोडीत काढत आणि मार्गातल्या असंख्य लोकांचा उध्दार करीत, त्यांना उपदेश करीत स्वामी समर्थ कसे सोलापूर येथील अक्कलकोट येथे पोहचले… कशी लोकांना त्यांच्या महानतेची प्रचिती येत गेली, अक्कलकोट येथील चोळप्पाशी, सेवेकरी सुंदराबाई, अक्कलकोटचे राजे मालोजीराव, या भक्तांनी स्वामीलीला अनुभवली आणि कृतार्थ झाले त्यांचे कसे नाते होते आणि या मार्गात आणखी कोणकोणती माणसं श्री स्वामी समर्थांच्या मार्गात आली हे सगळं प्रेक्षकांना या मालिकेमध्ये बघयाला मिळणार आहे. अक्कलकोट येथे स्वामींच्या वास्तव्याने वटवफक्षाखाली दोन दशके चैतन्य ऊर्जा नांदली ती कशी हे देखील प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
मालिकेबद्दल बोलताना लेखक शिरीष लाटकर म्हणाले, ष्मुळात श्री स्वामी समर्थ हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली वीस वर्षं मी स्वामी मार्गात आहे. त्यामुळे मी ज्यांची भक्ती करतो त्या स्वामींची गोष्ट मालिकेच्या रूपात सांगायला मिळणं हा एक आनंददायी अनुभव आहे आणि नुसता आनंदच नाही तर हे आव्हानसुद्धा आहे.