प्रतिनिधी/ सातारा
छत्रपती घराण्यांविषयी प्रत्येक व्यक्तीला आदर, मान आहे. बहुसंख्य नागरिक तर महाराजांना आपले प्रेरणास्थान मानून त्यांना आपल्या ह्रदयात पुजले जाते. अशाच वाई येथील एक ध्येय वेडा तरूण विश्वजीत साळुंखे याने तर छ. शाहू महारांच्या तीन भित्तीशिल्पांचे संशोधन केले आहे. साताऱयातील शुक्रवार पेठेतील बाजीराव विहिरीतील, किन्हईच्या साखरगड व शिखरशिंगणापूर येथील भित्तीशिल्पे प्रकाशात आणली आहेत. सदर शिल्पे पाहण्यासाठी गर्दी होत असून विश्वजीत साळुंखे याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विश्वजीत याला लहानपणा पासुनच छत्रपती घराण्याविषयी निष्ठा आहे. त्यातच त्याला सध्याची अत्याधुनिक तंत्रज्ञान हाताळण्याची हातखंडा असल्याने त्याने त्याच्या याच शैलीचा वापर करत जिल्हय़ात विविध ठिकाणावरील छ. शाहू महाराज्यांच्या भित्तीशिल्पांचे संशोधन केले आहे. त्याने याचे केवळ संशोधनच केले नसून त्यासंदर्भातील इत्त्यंभूत माहिती ही जाणून घेतली आहे. पुढीच्या पिढीला आपल्या महाराजांविषयीची माहिती व्हावी, या उद्देशाने अत्त्याधुनिक साहित्यांचा वापर करून चित्रफित बनविले आहे.
आपण अनेक ठिकाण ऐतिहासीक स्थळांना भेटी दिल्या आहेत. तेथील भित्ती शिल्प आपण पाहतो. पण त्यामागचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न मोजक्याच जणांकडून केला जातो. अनेक अशी शिल्पे आहेत की ती अजून दुर्लक्षित आहेत. अशा भित्तीशिल्पांना प्रकाशझोकात आणण्याचा प्रयत्न विश्वजीत साळुंखे यांनी केला. त्यांनी सातारचे अमर साळुंखे व मंगळवेढा सोलापूर येथील रवी मोरे ज्यांनी पंढरपुरच्या विठोबाच्या मंदिरातील शिल्पाचा शोध लावलेला. त्यांच्याकडून या सर्व शिल्पांविषयीची अधिक माहिती जाणून घेतली आहे.
टॅव्हल विश्व युटय़ुब चॅनल
विश्वजीत यांना शिल्पांचे ज्ञान आहे, त्यांचे टॅव्हल विश्व युटय़ुब चॅनल ही आहे. यापूर्वी त्यांनी धावडशी, लोहगड, मल्हारगड, मेरूलिंग, नकटय़ा रावळय़ाची विहीर कराड, नाना फडणवीस वाडा, पाली मंदिर, पुसेगाव आदी इतिहासीक ठिकाणांची माहिती घेऊन त्याचे ड्रोन, व कॅमेराच्या सहाय्याने व्हिडीओ चित्रफित बनविले आहे.
बाजीराव विहीरीतील शिल्प–
या मध्यभागी जे शिल्प आहे या शिल्पात छत्रपती शाहू महाराज व त्यांच्यासोबत एक सेवक दिसत आहे. शाहू महाराजांच्या एका हातात हुक्का तर दुसऱया हातात शस्त्र आहे. शिल्पाच्या मध्यभागी छत्रपती शाहू महाराज प्रसन्न मुद्रेत बसलेले दिसतात. त्यांच्या पिळदार मिशा त्यांच्या चेहऱयावरची शोभा आणखी वाढवताना दिसत आहेत. गळ्यामध्ये व दंडावर अलंकार आहेत. त्यांच्या गळ्यातील अलंकारावर जरा व्यवस्थित लक्ष टाकले तर लक्षात येते की हा अलंकार नसून ती कवडय़ाची माळ आहे. शुद्ध चारित्र्य आणि अतुलनीय पराक्रम हाच विराचा खरा दागिना असे छत्रपती शाहू महाराजांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांच्या शरीरावर अलंकार असलेले दिसत नाहीत. पंचा सोडला तर त्यांच्या शरीरावर वस्त्रs देखील नाहीत.
शिखरशिंगणापूर येथील शिल्प–
शाहू महाराज हुक्का ओढत असताना यामध्ये पंचा व धोतर परीधान केलेला हातामध्ये अलंकार व शाहू महाराज पक्षीप्रेम दिसून येते. 17 व्या शतकात राजेशाही दिसणारे एकमेव व्यक्तीमत्व म्हणजे शाहू महाराजच आहेत, हे माहीत होते. त्यातच या शिल्पामध्ये त्यांच्या हाताता एक पक्षी ही आहे. यावरूनच शाहू महाराज हे कलेचे पुजारक होते हे प्रकाशात येते. हे शिल्प दर्शन बारीमधून जाताना गर्भगृहात प्रवेश करताना पीतळी खांबा शेजारी डाव्या बाजुला आहे.
साखरगड येथील शिल्प–
1736 ते 1746 च्या दरम्यान औंधचे राजे पंतप्रतिनिधी यांनी येथील प्रसिद्ध अंबाबाई मंदिराची उभारणी केली. मंदिराच्या आवारात चार भव्य दीपमाळा आहेत. या ठिकाणाला अर्थात साखरगड संस्थान व संबंधित आर्किटेक्ट यांना सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को एशिया पॅसिफिक पुरस्काराने 28 फेब्रुवारी 2015 रोजी सन्मानित करण्यात आले आहे. या मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वाराच्या भिंतीवर बाहेरील बाजूस एक हुक्का ओढत असलेले छ. शाहू महाराजांचे शिल्प कोरलेले आहे. शाहू महाराज म्हंटल की शंभूपुत्र शाहू महाराज हे माहीत होत नाहीत. आशिया खंडात एकही ताकत नव्हती जी छत्रपती शाहू महाराजांच्या राज्यावर चाल करेल. ज्यांनी सातारा निर्माण केला त्यांच्या विषयीची माहीती सर्वासमोर म्हणाव्या तितक्या प्रकाशझोकात येत नाही हिच खंत विश्वजीत साळंखे याने ‘तरूण भारत’ शी बोलताना व्यक्ती केली.