आपल्या देशाची लोकसंख्या अधिक असली तरी आपण नक्कीच आपल्या परीने दिवसागणिक वन्यजीव संरक्षण आणि त्यांच्या संवर्धनाच्या दृष्टीने पावले टाकत आहोत. विविधतेने नटलेल्या आपल्या देशात वन्यजीवांच्या बाबतीतही विविधता आढळून येते. त्यांच्या संवर्धनासाठी लोकांपासून प्रशासकीय अधिकाऱयांपर्यंत काम करत आहेत. कधीकधी काही दुर्दैवी घटनांमुळे वन्यजीवांच्या संरक्षणाला गालबोट लागत असल्याचे अभिनेत्री विद्या बालनने म्हटले आहे.
वातानुकुलित स्टुडिओत चित्रिकरण करण्यापेक्षा मोकळय़ा हवेत, हिरवळीने वेढलेल्या आणि मोकळय़ा आसमंताखाली काम करण्याचा अनुभव काही औरच होता. नेहमीच्या सोयी-सुविधा नसल्या तरी फारशा अडचणी आल्या नाहीत. जंगल आपल्याला स्वतःमध्ये सामावून घेत असल्याचे उद्गार अभिनेत्रीने काढले आहेत.
दिग्दर्शन अमित मसूरकरचे दिग्दर्शन आणि गोष्ट सांगण्याची पद्धत मला अधिक भावली. अमित प्रेक्षकांना स्वतःच्या गोष्टीत शिताफीने गुंतवतो. गोष्ट पूर्ण होईपर्यंत प्रेक्षकांवरील पकड सुटत नाही. शेरनी चित्रपटाचा विषय आणि कथा ऐकल्यावर मी चटकन होकार दिल्याचे विद्या यांनी सांगितले आहे.