शिवेंद्रराजेंनी दिले ग्रामस्थांना आश्वासन
प्रतिनिधी/ सातारा
कोणतीही चुकीची प्रथा ही वाईटच असते. त्याच प्रथेला समाजसुधारणेची जोड दिली तर एक वेगळे पाऊल ठरते. अशीच बाब सातारा तालुक्यातील जकातवाडी या गावाने घेतलेला निर्णय, केलेला ठराव चार वर्षापुर्वी करण्यात येवूनही त्याची शासनाने दखल घेतली नसल्याने जकातवाडी ग्रामस्थांनी शासनाने काढण्यात आलेल्या अद्यादेशात बदल करुन जकातवाडी पॅटर्न असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी आमदार शिवेंद्रराजेंना भेटून त्यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्यावर शिवेंद्रराजेंनी लगेच ग्रामस्थांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांना भेटून पत्र पाठवून काढण्यात आलेल्या जीआरमध्ये बदल करुन घेण्यात येईल, अशी ग्वाही दिली.
दरम्यान, जकातवाडी ग्रामस्थांनीही शेवटपर्यंत ही चळवळ सुरुच ठेवू असा इशारा दिला आहे. 16 डिसेंबर 2018 रोजी जकातवाडी येथे ग्रामसभा पार पडली होती. त्या ग्रामसभेत सूचक राजेश भोसले यांनी विधवा विवाहाचा ठराव मांडला. सर्वच गावांने त्या ठरावास मंजूरी दिली. या ठरावानंतर जकातवाडी गावाच्यवतीने त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कमिटी नेमण्यात आली. विधवा विवाहाकरता प्रोत्साहन म्हणून 20 हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. तब्बल चार वर्षानंतर हेरवाड गावाचे नाव शासनाच्या जीआरवर झळकल्यावर ज्या गावाने सुरुवातीला ठराव घेतला, ते जकातवाडी गाव शासनाने काढलेला जीआरमध्ये बदल करण्यासाठी सरसावले आहे. गावात ग्रामस्थांनी बैठका घेवून पुढील दिशा व नियोजन करण्यात आले. त्यानुसार रविवार खास याच विषयाच्या अनुषंगाने सातारा-जावलीचे आमदार शिवेंद्रराजेंची ग्रामस्थांनी भेट घेतली.
यावेळी सरपंच उत्तम सणस, उपसरपंच हणमंत भोसले, माजी सरपंच चंद्रकांत सणस, सामाजिक कार्यकर्ते राजेश भोसले, तंटामुक्त समिती अध्यक्ष जनार्दन भोसले, डॉ. सचिन भोसले, तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक तुषांत माने, ग्रा.प. सदस्य सुजाता माने, बिस्मिल्ला शेख, माजी सरपंच राजेंद्र मोरे, दीपक देशमुख, उत्तम भोसले, अक्षय शिंदे, दत्तात्रय कुंभार आदी उपस्थित होते. त्यांनी आमदार शिवेंद्रराजेंना जकातवाडी गावाने हेरवाड या गावापेक्षा चार वर्षापूर्वी केला ठराव हा पूर्णपणे वेगळा आहे. हेरवाड या गावाने फक्त विधवा विवाहाची प्रथा बंद करण्यासाठी महिलेची कुंकू पुसू नये, हातातील बांगडय़ा फोडू नये असा आहे. परंतु जकातवाडी गावाच्या ठरावात एखाद्या महिलेस वैधव्य आल्यास त्या महिलेचा विवाह होत असल्यास त्या महिलेला प्रोत्साहन म्हणून 20 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा व विधवांचे विवाह होण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात यावेत, विधवांच्या पुन्हा समाजात सन्मानाची वागणूक मिळवून देण्यासाठी शासनाने समाजकल्याण विभाग वा महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून अनुदान देण्यात यावे, असा आहे. हा ठराव चार वर्षापूर्वी केला असून जकातवाडीचाच पॅर्टन असून तसा शासनाने काढलेल्या घाईघाईतील अद्यादेशात बदल करावा, जकातवाडी पॅटर्न हाच उल्लेख करावा. त्याकरता आपल्या माध्यमातून प्रयत्न व्हावे, अशी विनंती जकातवाडी ग्रामस्थानी आमदार शिवेंद्रराजेंच्याकडे करण्यात आली.
जकातवाडी प्रश्नी आमदार भेटणार अजितदादांना
राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा आणि आमदार शिवेंद्रराजेंचे अतिशय जवळचे मैत्रीचे संबंध आहेत. मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या हेरवाडच्या जीआरमध्ये बदल करण्याच्या अनुषंगाने ग्रामस्थांनी विनंती करताच आमदार शिवेंद्रराजेंनी मुंबईला गेल्यानंतर राज्याचे अजितदादांशी भेटून त्यावर चर्चा करतो, असे आश्वासन दिले. तसेच ते नुसते आश्वासन देवून थांबले नाही तर त्यांनी स्वीय्य सहाय्यक गणेश घोरपडे यांना अजितदादांना, खासदार सुप्रिया सुळे आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना विनंती पत्र काढण्याचे आदेश दिले. महेंद्र आबा यांनी हे पत्र तयार करुन पाठवले.
जकातवाडी पॅटर्नच
विधवा महिलांच्या बाबत ज्या प्रथा आहेत. त्या रद्द करुन हेरवलाड पॅटर्न नुकतेच शासनाने सुरु करण्यासाठी आठवण करुन शासनाने सर्व ग्रामपंचायतींना कळवले आहे. तसेच ठराव करावे. जकातवाडीचे ग्रामस्थ येथे आले होते. त्यांनी रेकॉर्ड सगळे आणले आहे. जकातवाडी ग्रामपंचायतींने हा पहिल्यांदा 2018 च्या आधीच हा ठराव केलेला आहे. त्यांनी याच्यामध्ये नुसते विधवा महिलांच्याबाबतीतील प्रथावर नाही तर पुकु लावायचे नाही, काकणे फोडायची नाही यापुढे जावून विवाहाचा पुर्नविवाह करण्याचा ठरावात उल्लेख केलेला आहे. हेरवाड पॅटर्न म्हणून केले जात आहे. शासनाने दखल घ्यावी असे त्यांचे म्हणणे आहे. आतंरजातीय विवाहांना शासनाकून मदत अनुदान स्वरुपात दिली जाते. तसेच विधवांचे पूर्नविवाह झाले तर त्यास अनुदान देण्यात यावे.त्याबाबतीत लवकरच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांची भेट घेवून जी जकातवाडी ग्रामस्थांची अपेक्षा आहे. त्यांची मागणी आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर गोष्टी घालेन, सुधारणा करणे गरजेचे आहे ते अजितदादांच्या माध्यमातून करुन घेवू, असे आश्वासन दिले.