सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे विधान : संरक्षण क्षेत्रात सुधारणांची गरज
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय सैन्य जगातील कुठल्याही अन्य सैन्याच्या तुलनेत अधिक प्रमाणात आव्हानांना सामोरे जात आहे. याचमुळे संरक्षण क्षेत्रात संरचनात्मक सुधारणांची गरज आहे. युद्धाच्या स्पेक्ट्रमला पूर्ण करण्यासाठी अन्य देशांनी कुठले बदल केले आहेत, याचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. 20 व्या शतकात माहिती आणि तांत्रिक विकासामुळे युद्धाचे स्वरुप आणि प्रकारात मोठे परिवर्तन दिसून आल्याचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी गुरुवारी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले आहे.
नवी उपकरणे आणि रणनीतिला लोकांशी वेगाने जोडण्यासाठी नियोजित प्रयत्न केले जाऊ शकतात. भारत एक गुंतागुंतीच्या सुरक्षा आणि आव्हानात्मक वातावरणाचा सामना करत आहे. राष्ट्रीय सुरक्षा रणनीति, उच्च संरक्षण धोरणात्मक मार्गदर्शन, उच्च संरक्षण आणि संचालन संघटनांमध्ये धोरणात्मक सुधारणांची व्याखा तयार करणे अशी महत्त्वाची पावले उचलण्याची गरज असल्याचे सीडीएस रावत यांनी नमूद केले आहे. भारताला मागील काही वर्षांमध्ये पाकिस्तान तसेच चीन सीमेवर आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. याचमुळे भारतीय सैन्याच्या कामगिरीकडे जगाचे लक्ष लागून राहिले आहे.