प्रतिनिधी / जत
जत तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत जाईल तशी पाणी टंचाई देखील गंभीर बनत आहे, तालुक्यात आजमितीस सहा टँकरने तब्बल नऊ हजार 248 लोकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. एकीकडे कोरोनो व्हायरसमूळे संचारबंदी सुरू आहे, कामधंदा नसल्याने लोक हैराण झाले आहेत तर आता वाढत्या उन्हामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणऊ लागली आहे. जत तालुक्यातील सहा गावांना शासकीय टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. यात अंकलगी गावभाग एक, वाडीवस्ती एक, सोन्याल एक, माडग्याळ एक, गोंधळेवाडी एक, लमांन तांडा दारीबडची एक असे टँकर सुरू असून, नऊ हजार 248 बाधित लोकांना पाणी पुरवठा केला जात आहे.
दरम्यान, लॉकडाऊन काळात सरकारने नारेगाची कामे सुरू करण्यास परवानगी दिल्याने तालुक्यातील 116 गावात वैयक्तिक लाभ व शाळा पटांगण कंपाऊंडची काही कामे सुरू करण्यात आली असून सुमारे 2800 लोकांना यातून रोजगार उपलब्ध झाला आहे. यावेळी मागणी येताच टँकर देऊ असे तहसिलदार सचिन पाटील म्हणाले, जून अखेर चा आराखडा तयार आहे, टंचाईचे नियोजन करण्यात आले आहे. आज रोजी सहा टँकर सुरू आहेत. ज्या गावातून मागणी येत आहे. तिथे त्वरित पाहणी करून टँकर देण्याचे नियोजन केले आहे.