ऑनलाईन टीम / मुंबई :
येत्या मे महिन्यापासून सुरू होणाऱया जनगणनेच्या पहिल्या टप्प्यातील कामासाठी शालेय शिक्षकांच्या नेमणुका केल्या जाणार आहेत. त्यासंदर्भात शासनाने शिक्षणाधिकाऱयांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्यामुळे यंदाच्या मे महिन्यातील शिक्षकांच्या सुटय़ा रद्द होणार आहेत.
सन 2021 मध्ये जनगणना होणार आहे. त्या जनगणनेचा पहिला टप्पा येत्या 1 मे 2020 ते 15 जून 2020 या कालावधीत होणार आहे. त्या कामासाठी शासन मोठय़ा प्रमाणात शालेय शिक्षकांची नेमणूक करणार आहे. त्यामुळे शिक्षकांच्या वर्षातील 76 पैकी तब्बल 39 सुट्टया रद्द होणार आहेत. जणगणनेच्या कामासाठी घरांना क्रमांक देणे, गटाची विभागणी आदी कामे शिक्षकांना करावी लागणार आहेत.
मे महिन्यातील शालेय सुट्टया रद्द होणार असल्याने शिक्षकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, शासनाच्या या निर्णयाचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने निषेध केला आहे. शासनाने हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा ही मागणी शिक्षक परिषदेने केली आहे.