रणजित देशमुखासह भाजपा कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश
प्रतिनिधी / वडूज
जिल्हा एमएसयूआय व जिल्हा युवक काँग्रेसच्या माघ्यमातून आणि जनआंदोलनाद्वारे चळवळ उभी करणाया रणजीतसिंह देशमुख यांना पक्षीय पातळीवर निश्चितच मदत करणार परंतू दुष्काळी भागात दोन यशस्वी सुतगिरण्या उभारणाया व येथील जनतेच्या विकासासाठी अहोरात्र झगडणाया देशमुख यांना कॉग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वती परी ताकद देणार असल्याचे सुतवाच प्रदेशाध्यक्ष व महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
मुंबई येथील महाराष्ट्र प्रदेश कॉग्रेस कमेटी येथे पार पडलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, सातारा जिह्याचे संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील, कृषी राज्यमत्री विश्वजीत कदम, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, आमदार भाई जगताप, राज्यप्रवक्ते सचीन सावंत, उदयसिंह पाटील उडांळकर, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोकराव गोडसे, आदिची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की काही तांत्रीक व भौगोलीक कारणामुळे रणजीतसिंह देशमुख यांच्यावर अन्याय झाला हे आपण मान्य करतो. यापुढे जनतेच्या विकासासाठी झगडणाया देशमुख यांना माण- खटाव मतदारसंघात पूर्ण ताकदीनिशी मदत करणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. मला दिलेला शब्द तंतोतत पाळून मोठया दिमागात सुतगिरणी यशस्वीरित्या चालवून कर्जमुक्तही केली त्यामुळे या पुढील काळात औद्योगीक क्षेत्रासाठी त्यांना पक्षपातळीवर सर्वतोपरी सहकार्य करू.
कॉग्रेस प्रवेशानंतर रणजीतसिंह देशमुख म्हणाले की पुन्हा कुंटूबात आल्याने नवी उमेद, नवी जबाबदारी स्विकारून माढा लोकसभा व माण विधानसभा मतदारसंघासहीत जिह्यात उदयसिंह पाटील उडांळकर यांच्याबरोबर राहून राज्यातील वरिष्ठ नेते व पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गतवैभव प्राप्त करून देण्यास कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सुत्रसंचालन मोहन जोशी यांनी केले तर आभार जिल्हाघ्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांनी मानले. यावेळी सांगली जिल्हाघ्यक्ष पृथ्वीराज पाटील, मुंबई बाजार समितीचे अध्यक्ष प्रवीण देशमुख, खटाव तालुकाघ्यक्ष डॉ. विवेक देशमुख, माजी नगराघ्यक्ष डॉ. महेश गुरव ,माण तालुकाध्य एम.के. भोसले,मानाजी घाडगे, ऍड . संतोष पवार, सचीन घाडगे, प्रकाश मोहिते, संजय शेठ शितोळे, श्रीरंग देवकर, हणमंत भोसले, विनायक जगदाळे, सत्यवान कांबळे, विकास साबळे, राजूभाई मुलाणी, शरद बागल, विश्वंभर बाबर, बाबासाहेब माने, शिवाजी यादव,घर्मराज जगदाळे, संजय पाटील, सदाशिव खाडे, परेश जाधव, आदीसह खटाव माण तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्याची उपस्थिती होती.
युवाशक्ती एकवटली – बंटी पाटील
नुकत्याच सातारा जिल्हयात बाबा -काका मनोमिलनानंतर रणजीतसिंह देशमुख यांच्या रूपाने स्वगृही परतल्यानंतर जिल्हा कॉग्रेसमधील युवाशक्ती एकवटल्याने पक्षाला गतवैभव प्राप्त होईल. या जिल्हयाचा संपर्क मंत्री म्हणून सर्वातोपरी सहकार्य राहील अशी ग्वाही गृहरा ज्यमंत्री तंथा संपर्क मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी देताच टाळ्याचा कडकडात झाला.
पक्षप्रवेश ..
रणजीतसिह देशमुख यांच्या बरोबरीने गुरसाळ्याचे डॉ. बाळासाहेब झेंडे, माजीपचायंत समिती सदस्य भरत जाधव, संजीव साळुंखे, निलेश जाधव, दत्ता कदम, आदि सहमाण खटाव तालुक्यातील प्रमुख शेकडो कार्यकर्त्यनी कॉग्रेस पक्षात प्रवेश केला.