प्रतिनिधी /पणजी
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी पाण्याची बिले देताना गोंधळ घातल्याने ग्राहकांना भरमसाठ बिले आली आहेत. पुढील दोन महिने ही बिले जनतेने फेडू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले आहे.
आपल्याच सरकारातील सार्वजनिक बांधकाम खात्याचा पाणी वितरण विभाग किती निष्क्रिय आहे हे मान्य करताना या प्रकरणी आपण चौकशी करण्याचा आदेश दिल्याची माहिती त्यांनी दिली.
प्रत्येक घराला 16 हजार लीटर पाणी मोफत देण्याचे सरकारचे धोरण आहे. त्यामुळे सुधारित बिले जारी करण्यात येतील. तसेच बिल भरण्यास वन टाईम सेटलमेन्ट योजना 31 मार्च 2022 पर्यंत चालू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.