प्रतिनिधी/ सातारा
जिह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे नियम मोडून विनाकारण वाहने रस्त्यावर घेऊन फिरणाऱयांची वाहने पोलिसांनी जप्त केली होती. आता ही वाहने दंडात्मक कारवाई करून सोडली जाणार आहेत. याप्रकरणी जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आदेश दिला आहे. परंतु, गुन्हे दाखल झालेल्यांना न्यायालयाच्या परवानगीनेच वाहने घेता येणार आहेत.
देशासह राज्यामध्ये 23 मार्चपासून लॉकडाऊन जाहीर झाला. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व उद्योग, व्यवसाय व दुकानांवर निर्बंध आले. जिल्हाधिकाऱयांनी जिह्यामध्ये जमावबंदीचे आदेश जारी केले होते, नागरिकांना अत्यावश्यक सेवा वगळता अन्य कारणांसाठी घराबाहेर पडण्यास बंदी घालण्यात आली होती. अत्यावश्यक सेवांमध्ये असलेल्या नागरिकांनाच दुचाकी किंवा चारचाकी वाहन वापरण्यास या कालावधीत मुभा देण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱयांचे आदेश डावलूनही जिह्यामध्ये अनेकजण रस्त्यावर येत होते. नियम मोडणाऱयांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी दिले. त्यामध्ये अनावश्यकपणे गाडय़ा बाहेर काढणाऱयांच्या गाडय़ाच जप्त करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला. त्यानुसार जिह्यातील सर्व पोलीस ठाण्यांनी आपापल्या परिसरामध्ये गाडय़ा जप्तीची मोहीम सुरू केली. जिह्यातील विविध पोलीस ठाण्यांनी आत्तापर्यंत 205 चारचाकी गाडय़ा, तर तब्बल चार हजार 418 दुचाकी जप्त केल्या आहेत. सातारा शहर, शाहूपुरी, कऱहाड या हद्दीत मोठय़ा प्रमाणावर कारवाया झाल्या आहेत.
लॉकडाऊनचा कालावधी वाढत गेल्याने जप्त केलेल्या गाडय़ा मिळणार कधी, असा प्रश्न संबंधितांना पडला आहे. अशांना आता दिलासा मिळाला आहे. तिसऱया लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकाऱयांनी प्रतिबंधित क्षेत्र वगळता अन्य ठिकाणी दुचाकीवरून एक व चारचाकी वाहनातून दोघांना प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यामुळे या निर्णयापूर्वी जप्त केलेली वाहने सोडण्याबाबत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी वाहने केवळ जप्त करण्यात आली आहेत. त्यांच्याकडून दंड भरून घेऊन गाडय़ा सोडण्यात येणार आहेत. मात्र, ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, अशांना न्यायालयाला विनंती करूनच वाहन सोडवून घ्यावे लागणार आहे.
जप्त केलेली वाहने संबंधित मालकांना ताब्यात दिली जाणार असून त्यासंदर्भात रजिस्टरला नोंद करून घेतली जाणार आहे. संबंधित मालकाकडून माझे वाहन ताब्यात मिळाले असून याबाबत मला कोणतीही तक्रार नाही, असेही ही नोंद करून घेतली जाणार आहे. त्यासाठी मालकांच्या सह्या घेतल्या जाणार आहेत यासंदर्भात जिह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते यांनी आदेश जारी केला आहे.