काँग्रेसमध्ये जबाबदारी स्वीकारून कामगिरी पार पाडण्याचे कसब असणारे लोक कमी होत असताना अहमद पटेल यांच्यासारखा मोहरा गमावल्याने काँग्रेसचे मोठे नुकसान होणार आहे. गुजरातसारख्या राज्यातून येऊन एका मुस्लिम व्यक्तीने राष्ट्रीय राजकारणात स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे सोपे नव्हते. अहमद पटेल यांनी ते साधले नेहरू, गांधी घराण्यावर असणाऱया अविचल नि÷sमुळे. सत्तेची सूत्रे ताब्यात असतानासुद्धा किंवा अनेक राज्यांचे मुख्यमंत्री बदलण्याची शब्दात ताकद असतानासुद्धा एखादी व्यक्ती आपल्याला दिलेल्या जबाबदारीच्या पलीकडे जाऊन कधीही थेट व्यक्त होत नाही. असे राजकारणात तरी सहजासहजी घडणे अशक्मय. पण अहमद पटेल यांनी आयुष्यभर हे व्रत जोपासले. अर्थात सत्तेच्या जबाबदाऱया सोपवणाऱया नेतृत्वाला असे लोक हवे असतात ते आपल्यावर होणारी टीका वळविण्यासाठी. प्रत्येक पक्षात असे ’काही’च लोक असतात, जे सत्तेच्या जबाबदाऱया पार पडताना स्वत: बदनाम होतात. मात्र, नेतृत्वाकडे बोट कधीही दाखवले जाऊ नये यासाठी प्रयत्नशील राहतात. देशातील सर्वच राजकीय पक्षांना निवडणुकांसाठी पैसा आणि संसाधने लागतात. काँग्रेससारख्या पक्षात उद्योगपतीपासून अभिनेत्यांपर्यंत सर्वांशी संपर्क असणारे नेते शब्द टाकत असतात. पूर्वी भाजप अशा निधीसाठी आपल्या पक्षाचे अध्यक्ष किंवा थोर नेत्यांचे वाढदिवस साजरे करून निधी उभा करायचा. काँग्रेस सत्तेत नसतानाही मोतीलाल व्होरा आणि अहमद पटेल यांनी ही जबाबदारी पार पाडली. जनता लाटेत देशातील दिग्गज नेत्यांनी इंदिरा गांधी यांची साथ सोडली असताना गुजरातमधल्या भरूचमधून ते इंदिरा काँग्रेसचे उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आले. त्या काळात इंदिराजींना भरूचमध्ये बोलावून पुन्हा सक्रिय करण्याचे श्रेय अहमद पटेल यांना दिले जाते. इंदिराजींच्या हत्येनंतर राजीव गांधी यांना पंतप्रधान होण्यासाठी प्रयत्न केलेल्या मंडळींमध्ये खारीचा वाटा अहमद पटेल यांनीही उचलला. ते नव्या युवा पंतप्रधानांचे संसदीय सचिव बनले. अर्थात राजीव गांधी यांची प्रतिमा मिस्टर क्लीन अशी झाली तरी मंडल, शहाबानो, राम मंदिर प्रकरणी त्यांची भूमिका चुकली. बोफोर्सच्या बदनामीने काँग्रेस इतिहासात प्रथमच विरोधी पक्षात बसली. मुदतपूर्व निवडणुकांमध्ये राजीव गांधींची हत्या झाली. त्यानंतरच्या लाटेत नरसिंहराव यांच्या रूपाने काँग्रेसला गांधी घराण्याबाहेरचा दुसरा पंतप्रधान मिळाला. मात्र राव यांच्या काळात सोनिया गांधी यांचे महत्त्व कमी करण्याचे प्रयत्न झाले. त्यात अहमद पटेल यांचाही नंबर लागला. गांधी घराण्यावरील नि÷ा सोडून रावांच्या तंबूत दाखल झाले नाहीत, त्यांनी देऊ करण्याची इच्छा व्यक्त केलेल्या सर्व सुविधा अहमद पटेल यांनी नाकारल्या. त्यामुळे भविष्यात जेव्हा अटलबिहारी वाजपेयी यांची कारकीर्द संपून काँग्रेसचे आणि सोनिया गांधी यांचे दिवस आले तेव्हा त्यांचे सल्लागार म्हणून अहमद पटेल यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आले. सोनियांच्या वीस वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी प्रादेशिक नेतृत्वाचे महत्त्व कसे कमी होईल आणि गांधी कुटुंबाचे महत्त्व कसे वाढत जाईल यावर भर दिला. मात्र पक्ष सोडणाऱयांशीही पटेल संपर्कात राहिले. देशातील प्रत्येक जिल्हा नेत्यांशीही त्यांचा थेट संपर्क होता. डॉ. मनमोहनसिंग यांची सत्ता दहा वर्षे टिकून राहण्यासाठी केलेले कष्ट खूपच महत्त्वाचे होते. प्रमोद महाजन यांच्यासारखा रणनीतीकार आणि अडवाणी यांच्यासारखा भाजपचा कट्टर चेहरा यांना दहा वर्षे रोखून धरण्यात, लालूप्रसाद यादव, मायावती, मुलायमसिंग यादव यांच्यापासून डावे आणि जयललितांच्यापर्यंत देशभरातील सर्वपक्षीय नेत्यांशी संवाद साधण्यात शिवाय मनमोहनसिंग आणि सोनिया गांधी यांच्या राजकीय भूमिकांवरून टोकाचे प्रसंग उद्भवणार नाहीत यासाठी विशेष काळजी घेतली. गुजरातमध्ये झालेल्या दंगलीनंतर पी. चिदंबरम आणि इतर काँग्रेस नेत्यांना काँग्रेसने नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मागे हात धुऊन लागले पाहिजे असे वाटत होते. त्यांच्यात आग्रहाखातर सोनिया गांधी यांनी नरेंद्र मोदी यांना ’मौत का सौदागर’ अशी उपाधी दिली. अहमद पटेल यांनी या काळात काँग्रेसने इतके टोकाला जाऊ नये, प्रकरणाच्या तपासावर सोपवून मोकळे व्हावे अशी भूमिका घेतली. मात्र त्यांचा सल्ला न मानणे काँग्रेसला पुढे बरेच महागात पडले. एका राज्याचा मुख्यमंत्री ते काँग्रेसची सत्ता हटवण्यासाठी मोदींना त्यामुळे संधी मिळाली. ‘काँग्रेसमुक्त भारत’ अशी घोषणा जेव्हा भाजपने दिली आणि राज्या-राज्यातील सत्तेमधून काँग्रेस दूर गेली त्यावेळी काँग्रेसच्या आक्रमक नेत्यांना आपली चूक समजून आली असेल. गेल्या काही दिवसात कोरोनाने त्रस्त अहमद पटेल जेव्हा दवाखान्यात मृत्यूशी झुंजत होते, तेव्हा काँग्रेसचे 23 नेते स्वतःच्या पक्षाच्या विरोधात ‘लेटर बॉम्ब’ टाकून घडणाऱया घडामोडींकडे पाहत नेतृत्वाने जबाबदारी पेलेल अशा माणसांच्याकडे ती सोपवावी अशी मागणी करत होते. त्यांचा राहुल गांधी यांच्याविषयीचा संताप लपून राहिलेला नाही. तसे तर अहमद पटेल हेही राहुल गांधी यांना नकोसे झालेले नेते होते. त्यांनी त्यांना बाजूला ठेवण्याचे सर्व प्रकारे प्रयत्न केले. मात्र 2017 मध्ये गुजरातेतून राज्यसभेवर पाठवणाऱया सदस्यांमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे आव्हान परतवून लावू शकेल असा सोनिया गांधीना एकच आश्वासक चेहरा वाटला तो अहमद पटेल यांचा होता. शंकरसिंह वाघेला यांच्यासारखा मोहरा फोडूनसुद्धा भाजपचे चाणक्मय काँग्रेसच्या चाणक्मयाला पराभूत करू शकले नाहीत. 2018साली पक्षाची गरज लक्षात घेऊन राहुल गांधी यांनी त्यांना पक्षाच्या खजिनदारपदी नियुक्त केले. विरोधात एक शब्दही न बोलता आपले महत्त्व निर्माण करण्याचे हे कसब काँग्रेसच्या 23 नेत्यांच्याकडे नव्हते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या प्रयोगाला त्यांनी साथ देऊन देशातील एक वेगळी खेळी यशस्वी करण्यात वाटा उचलला. याला म्हणतात जबाबदारी पार पाडणे. हे जेव्हा काँग्रेसचे बंडखोर नेते समजतील तेव्हा त्यांना काँग्रेसचे झालेले नुकसान समजून येईल!
Previous Articleभारतीय संविधान : प्रगती आणि स्थैर्याचा आधारस्तंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.