उमेदवारांतून तीव्र संताप : प्रादेशिक आयुक्तांनी लक्ष देण्याची गरज
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेची निवडणूक झाल्यानंतर उमेदवारांनी आपला झालेल्या खर्चाचा अहवाल निवडणूक अधिकाऱयांकडे देणे बंधनकारक आहे. मंगळवार दि. 7 रोजी अहवाल देण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र गोवावेस येथील कार्यालयामध्ये निवडणूक अधिकारीच गायब होते. त्यामुळे जमा-खर्च द्यायचा कोठे? असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. महानगरपालिकेची निवडणूक म्हणजे सावळागोंधळ करणारी निवडणूक ठरू लागली आहे. या प्रकारामुळे उमेदवारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांचे कोणतेच नियंत्रण या अधिकाऱयांवर नसल्याचे दिसून येत आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पार पडेपर्यंत वारंवार तक्रारी झाल्या आहेत. हे अधिकारी सावळागोंधळ करताना दिसत आहेत. त्यांच्यावर कोणाचेच नियंत्रण नाही. निवडणूक म्हणजे एखाद्या खेळाचाच प्रकार झाल्याचे दिसून येत आहे. नियमांची पायमल्ली वेळोवेळी अधिकारीच करत आहेत. उमेदवारांनी आपला खर्च दाखल केल्यानंतर त्यांची ठेवरक्कम परत दिली जाते. मंगळवारी हा शेवटचा दिवस होता. मात्र गोवावेस येथील कार्यालयात अधिकारीच नव्हते. तर यापूर्वी अनेकवेळा गेल्यानंतर उद्या या अशी उत्तरे दिली जात होती. निवडणूक खर्च दिला नाही तर हेच अधिकारी नोटीस देण्याची शक्मयता आहे.
नुकतीच झालेली ही निवडणूक विविध कारणांनी वादाची ठरली आहे. त्या वादामध्ये दिवसेंदिवस भरच पडत चालली आहे. निवडणूक अधिकारी जाग्यावरच नाहीत. उद्या याच उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यासही हे मागेपुढे पाहणार नाहीत. तेव्हा बेळगावात सध्या वातावरण पूर्ण गढूळ बनले आहे. जिल्हाधिकारी कुचकामी ठरले आहेत. तेव्हा आता प्रादेशिक आयुक्तांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जिल्हय़ाचा कारभार सुरळीत करावा, अशी मागणी होत आहे.