शेतकऱयांचा राष्ट्रीय प्राधिकरणाला इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास रस्त्याविरोधात शेतकऱयांनी न्यायालयीन लढाई लढली. त्यामध्ये त्यांना यश आले. उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयात याबाबत निर्णय देण्याचा आदेश दिला आहे. आता दिवाणी न्यायालयात शेतकरी न्यायालयीन लढा लढणार आहेत. असे असताना जर पोलिसांची दडपशाही करत जमिनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्यास आत्मदहन करू, असा इशारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आला आहे.
हलगा-मच्छे बायपास रस्त्यामध्ये शेतकऱयांच्या सुपीक जमिनी जात आहेत. या रस्त्याची काहीच गरज नाही. असे असताना नोटिफिकेशन चुकीचे काढून शेतकऱयांच्या जमिनी हिसकावण्याचा प्रयत्न झाल्यास शेतकरी गप्प बसणार नाहीत, असे त्यांनी ठणकावून सांगितले. 0 किलोमीटरपासून मच्छेपर्यंत हा रस्ता करायचा आहे. मात्र त्या ऐवजी इतर ठिकाणांहून हा रस्ता करण्याचा प्रयत्न केल्यास शेतकरी गप्प बसणार नाहीत, असे त्यांनी सांगितले.
या बायपास रस्त्यासाठी अनेक वेळा बळाचा वापर करण्यात आला आहे. मात्र, शेतकऱयांनी विरोध केल्यामुळे पोलिसांना माघारी परतावे लागले. मागील वषी जबरदस्ती करत जमीन कब्जात घेण्यात आली. त्या विरोधात शेतकऱयांनी लढा दिला. ऍड. रवी गोकाककर यांनी शेतकऱयांची बाजू खंबीरपणे मांडून शेतकऱयांना न्याय मिळवून दिला आहे. तेव्हा आता यापुढे या जमिनीत पाऊलदेखील ठेवू नका, असा इशारा देण्यात आला.
यावेळी रयत संघटनेचे अध्यक्ष हणमंत बाळेकुंद्री, कार्याध्यक्ष भोमेश बिर्जे, मोनाप्पा बाळेकुंद्री, सुभाष चौगुले, सुरेश मायाक्काचे, अनिल अनगोळकर, भैरू कंग्राळकर, तानाजी हलगेकर, नितीन पैलवानाचे, महेश चतुर, विठ्ठल बाळेकुंद्री, विनायक हलगेकर, रेणुका बाळेकुंद्री, गीता बाळेकुंद्री, सविता बिर्जे, मालु बाळेकुंद्री, कृष्णाबाई बिर्जे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.