काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांची माहिती
प्रतिनिधी/ वाळपई
खरे म्हणजे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आभार मानायला पाहिजे. आयआयटी प्रकल्पामुळे सत्तरी तालुक्मयातील जनतेला जमीन मालकी प्रश्नावर एकसंघ होण्याची चांगली संधी प्राप्त झालेली आहे. गोवा मुक्तीनंतर आतापर्यंत या प्रकरणी अनेक स्तरावर मागण्या करूनही सरकारने त्याला भीक घातली नाही. आता जमीन मालकी प्रश्नी सत्तरी तालुक्मयातील जनता पेटून उठणार आहे. ही संधी विश्वजित राणे यांनी निर्माण करून दिल्याबद्दल शेळ मेळावली येथे आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात आयोजित केलेल्या मोठय़ा सभेमध्ये काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी स्पष्ट केले आहे.
हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत रद्द व्हायलाच पाहिजे. याच्या शिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. आमचा आयआयटी प्रकल्पाला विरोध अजिबात नाही. मात्र या भागातील जनतेच्या जमिनीवर जर हा प्रकल्प उभारून त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाची समस्या निर्माण होत असेल तर या प्रकल्पाला विरोध करावाच लागेल. येणाऱया काळात सरकारचे डोळे उघडण्यासाठी आझाद मैदानावर राज्यपातळीवर सभा घेण्याची घोषणा गिरीश चोडणकर यांनी केली आहे.
सत्तरी तालुक्मयातील जमीन मालकी प्रश्नी आता जनता हळूहळू जागी होऊ लागली आहे. गेल्या एक महिन्यापासून यासंबंधी मोठय़ा बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. मेळावली येथे आयआयटी प्रकल्पाचा मूळ मुद्दा म्हणजे जमीन मालकीचा प्रश्न. या जमिनीवर आतापर्यंत अनेक प्रकारच्या झाडांची लागवड केलेली आहे. मुळात ही जमीन याभागातील जनतेच्या नावावर नाही. यामुळे सरकार या जमिनीवर हा प्रकल्प लादू पाहत असल्याने जमीन मालकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे.
रविवारी शेळ मेळावली जल्मी देवस्थानच्या प्रांगणात आयोजित केलेल्या या सभेमध्ये सत्तरी तालुक्मयातील जमीन मालक मोठय़ा प्रमाणात सहभागी झाले होते. येणाऱया काळात हा प्रश्न सत्तरी तालुक्मयात बऱयाच प्रमाणात पेटण्याची शक्मयता आहे. त्यामुळे सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष न करता गांभीर्याने घेण्याचा सुर या सभेमध्ये वेगवेगळय़ा वक्त्यांनी व्यक्त केलेला आहे.
सत्तरीत परिवर्तन होत आहे
सत्तरी तालुक्मयात जमीन मालकी प्रश्नी परिवर्तन होत असल्याबद्दल गिरीश चोडणकर यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोणत्याही प्रकारच्या राजकीय वरदहस्ताखाली न जुमानता सत्तरीतील जनतेने या प्रश्नी आता उघडपणे आक्रमक भूमिका घेण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत गोव्यातील बहुजन समाजावर वेगवेगळय़ा माध्यमातून अन्याय होताना दिसत आहे. त्यातीलच हा प्रकार आहे. यामुळे बहुजन समाजाने एकाच व्यासपीठावर येऊन अशा प्रकारच्या आंदोलनाला पाठबळ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
पर्यावरण आम्ही सांभाळले : रणजीत राणे
या प्रकल्पाच्या माध्यमातून पर्यावरणाचा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. मात्र गेल्या शेकडो वर्षापासून सत्तरी तालुक्मयातील जनतेने पर्यावरणाचे रक्षण खऱयाअर्थाने केलेले आहे. यामुळे पर्यावरणाचा मुद्दा समोर करून या भागातील जनतेच्या कष्टाच्या श्रमावर नांगर फिरवण्याचे काम सरकारने करू नये, अन्यथा या भागातील जनता सरकारला कधीही माफ करणार नाही, असे असे सामाजिक कार्यकर्ते रणजीत राणे म्हणाले. यावेळी स्थानिक आमदार विश्?वजित राणे यांच्यावर कडाडून टीका केली. आपले वडील स्व. जयसिंग राणे यांनी मोकासदारी पद्धती विलीन करून जमिनी जमीन मालकाच्या नावावर उतरुन देण्याचा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी भरपूर प्रयत्न केला याची आठवण करून दिली.
मुख्यमंत्री धुतराष्ट्र : दशरथ मांदेकर
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत धृतराष्ट्र बनलेले आहेत. आरोग्यमंत्री विश्वजित राणे वेगवेगळय़ा माध्यमातून जनतेवर अन्याय करीत आहेत, असे असताना मुख्यमंत्री धृतराष्ट्राची भूमिका बजावत असल्य्याचे काम करीत असताना आपल्यासारख्या कार्यकर्त्याला अटक करून या आचा आरोप यावेळी अध्यक्ष दशरथ मांद्रेकर यांनी केला. अन्यायाला वाचा फोडणांदोलनाचा आवाज दडपण्याचा प्रयत्न कदापि सहन केला जाणार नाही, असेही मांदेकर यांनी स्पष्ट केले.
तर गावरचना नष्ट होणार : राजेश गावकर.
या प्रकल्पाच्या माध्यमातून गावरचना नष्ट होणार असल्याची भीती राजश्री गावकर यानी व्यक्त केली. 1999 साली अभयारण्याची अधिसूचना जाहीर केली. मात्र त्यावेळी झालेल्या प्रखर विरोधामुळे त्याची अंमलबजावणी अजून होऊ शकलेली नाही. आता खरोखरच या भागातील जनतेचा विजय असल्याचे स्पष्ट केले. आता या प्रकल्पाला विरोध करून शेळ मेळावलेल्या भागातील जनतेने खऱया अर्थाने आंदोलनाचा चांगला आदर्श निर्माण करून दिलेला आहे, असे ते म्हणाले.
आमिषांना बळी पडू नका : ऍड. शिवाजी देसाई
या आंदोलनाला सुरुंग लावण्याचा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून होत आहे. यामुळे आतापर्यंत या भागातील जनतेने दाखवलेली एकजूट खरीच वाखणण्याजोगी आहे. यामुळे येणाऱया काळात आमिषाला बळी न पडता आंदोलनाची धग कायम राहावी यासाठी याभागातील जनतेने सतर्क राहावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते शिवाजी देसाई यांनी केले.
याप्रसंगी व्यासपीठावर कूळ मुंडकार संघटनेचे रामकृष्ण जल्मी, वाळपई महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रोषन देसाई, पदाधिकारी उषा च्यारी, सुरेश कोदाळकर, मोहम्मद खान, सामाजिक कार्यकर्ते ऍड. गणपत गावकर, शिवाजी देसाई, सामाजिक कार्यकर्ते विश्वेश परब, राजेश गावकर यानी पंचायत सभासद अर्जुन मेळेकर, शशिकांत सावर्डेकर, शुभम शिवलकर, राम मेळेकर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मेघश्याम राऊत, मंगलदास नाईक, गौरीष गावस व इतर हजर होते.
सत्तरी तालुक्मयातून मोठय़ा प्रमाणावर नागरिक उपस्थित
दरम्यान गेल्या काही महिन्यापासून सत्तरी तालुक्मयात जमीन मालकीच्या प्रश्नी sगवेगळय़ा गावांमध्ये जनजागृतीच्या बैठका आयोजित करण्यात येत आहे. आजच्या सभेमध्ये वेगळय़ा गावातील नागरिक मोठय़ा प्रमाणात उपस्थित राहून या आंदोलनाला आपला पाठिंबा व्यक्त केलेला आहे.