गुलाम नबी आझाद यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन : पक्षातील कमजोरीवर ज्येष्ठांचा प्रहार
जम्मू / वृत्तसंस्था
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी तामिळनाडू या विधानसभा निवडणूक जाहीर झालेल्या राज्याच्या दौऱयावर असतानाच पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांनी जम्मू -काश्मीरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले. राज्यसभेतून अलिकडेच निवृत्त झालेल्या गुलाम नबी आझाद यांच्या समर्थनार्थ जवळपास 23 नेते एकत्र आल्याने त्यांना ‘जी 23’ असे संबोधण्यात आले होते. भगवे फेटे परिधान करून शांती संमेलनात सहभागी झालेल्या या नेत्यांनी आझाद यांच्या कार्याचे कौतुक करत पक्षनेतृत्त्वावर प्रहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाविषयी काँग्रेसमधील 23 ज्ये
नेत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यापैकी काही नेते माजी खासदार गुलाम नबी आझाद यांच्या निमंत्रणावरुन जम्मूत एकवटले होते. काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद हे राज्यसभेतून नुकतेच निवृत्त झाले. काँग्रेसच्या नेतृत्त्वाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱया 23 नेत्यांमध्ये समावेश असल्यामुळेच गुलाम नबी आझाद यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यात आले नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
काँग्रेस पक्ष दुबळा होत चालला आहे, हे सत्य आता स्वीकारायला हवे. त्यामुळेच आम्ही एकत्र जमलो आहोत, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्ये÷ नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले. शनिवारी जम्मूत आयोजित करण्यात आलेल्या शांती संमेलनात बोलत होते. कपिल सिब्बल यांनी अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षातील त्रुटींवर बोट ठेवले. काँग्रेस पक्ष दुबळा होत चाललाय हे आपण डोळय़ांनी पाहतोय. त्यामुळेच आम्ही आज इथे जमलो आहोत. ही गोष्ट आम्ही फार पूर्वीच करायला पाहिजे होती. आपल्याला काँग्रेसला पुन्हा बळकट करावे लागेल, असे सिब्बल यांनी म्हटले.
आनंद शर्मा यांचीही नाराजी उघड
जम्मू-काश्मीरचा एकही प्रतिनिधी राज्यसभेत नसणे ही वेळ 1950 नंतर प्रथमच आली आहे. ही चूक सुधारली पाहिजे. गेल्या दशकभरात काँग्रेस पक्ष कमकुवत झाला. आम्ही पक्षाच्या भल्यासाठी आवाज उठवत आहोत. देशभरात काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा बळकट झाला पाहिजे. नव्या पिढीने पक्षाशी स्वतःला जोडून घेतले पाहिजे. आम्ही काँग्रेसचा सुवर्णकाळ पाहिला आहे. मात्र, आता आम्हाला उतारवयात काँग्रेसची दुर्बलता पाहायची नाही, असे परखड मत आनंद शर्मा यांनी मांडले.
मनीष तिवारी, राज बब्बर यांनी केले नबींचे कौतुक
गुलाम नबी आझाद एक एकनि÷ काँग्रेस नेते आहेत. जे नेते काँग्रेसला चांगल्या पद्धतीने समजतात त्यापैकी ते एक आहेत. काँग्रेस आणि देशाला त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता आहे, असे काँग्रेस नेते मनीष तिवारी म्हणाले. तर, काँग्रेस बलशाली व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. पक्षाच्या आदर्शांमुळेच गुलाम नबी मोठे झाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांच्या निवृत्तीवर भावूक झाले होते, हीच त्यांची मोठी कामगिरी असल्याचे काँग्रेस नेते राजबब्बर म्हणाले.