कलम 370 हद्दपार झाल्यानंतर पहिलाच दौरा
वृत्तसंस्था /जम्मू
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 आणि 35अ हद्दपार झाल्यावर सरसंघचालक मोहन भागवत पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरच्या दौऱयावर जाणार आहेत. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. 1-3 ऑक्टोबरपर्यंत ते केंद्रशासित प्रदेशात राहणार आहेत. तेथील विचारवंतांशी ते संवाद साधणार आहेत.
भागवत हे सुमारे दोन वर्षांनी जम्मू-काश्मीरमध्ये पोहोचणार आहेत. विचारवंतांसोबतची बैठक जम्मूमध्ये होणार आहे. सरसंघचालक दौऱयादरम्यान संघ प्रचारकांनाही भेटणार आहेत. तसेच त्यांची संघाशी संलग्न संघटनांच्या प्रमुखांशी देखील चर्चा होईल. कलम 370 हद्दपार झाल्यानंतर बदललेल्या स्थितीचा ते आढावा घेतील. संघ समाजासाठी काम करतो आणि कलम 370 हद्दपार झाल्यापासून जम्मू-काश्मीरमधील स्थिती सुधारल्याचे एका संघ प्रचारकाने म्हटले आहे.