ऑनलाईन टीम / तरुण भारत
जम्मु- काश्मीर आणि दहशतवादी कारवाया हे समीकरण भारत – पाक फाळणीनंतर आज ही सुरुच आहे. याच पार्श्वभुमीवर जम्मू-काश्मीर सरकारने केंद्रशासित प्रदेशातील कठुआ जिल्ह्यात दहशतवादी, फुटीरतावादी व इतर राष्ट्रविरोधींसाठी पहिल्यांदाच विशेष उच्च सुरक्षा असलेला तुरुंग तयार करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
यानिमित्ताने कठुआमध्ये तुरुंग विभागाला ३७ एकर जमीन हस्तांतरित केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद फोफावल्याच्या तीन दशकापासून दहशतवाद्यांशी संबंधित विशेष तुरुंग तयार केला जात आहे. महसूल विभागाचे सचिव विजयकुमार बिधुडी कठुआत उच्च सुरक्षा असलेल्या कारागृहाच्या स्थापनेसाठी जमीन हस्तांतरणासाठी औपचारिक रूप देण्याचे आदेश बजावले. कठुआ जिल्ह्यातील महानपूर भागात उच्च सुरक्षेचे कारागृह उभारले जात आहे.
सुरक्षा संस्थांशी विचारविनिमय करून हे ठिकाण निश्चित करण्यात आले. हे प्रस्तावित कारागृह आंतरराष्ट्रीय सीमेपासून जवळ डोंगराळ भागात आहे. या भागात सामान्य नागरिकांची वर्दळही कमी आहे. हे एक सुरक्षित ठिकाण आहे. त्या भागात घुसखोरी करता येत नाही.कारागृहात जामर, आंगतुक व कैदी यांच्यात पारदर्शक भिंत, सुनावणीसाठी विशेष चेम्बरही असेल. कारागृहात अतिरेक्यांच्या पुनर्वसनावरही भर दिला जाईल असे ही स्पष्ट केले आहे.