वृत्तसंस्था/ श्रीनगर
जम्मू काशमीरमध्ये मंगळवारी सकाळी 8.16 वाजता मध्यम स्वरुपचा भूकंप झाला. रिश्टर स्केलवर याची तीव्रता 3.9 नोंदवण्यात आली. तथापि या भूकंपामध्ये कोणतीही जीवित वा वित्त हानी झाली नसल्याचे प्रशासकीय अधिकाऱयांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमधील आपत्ती निवारण कक्षातून देण्यात आलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू श्रीनगरपासून उत्तरेला 14 किलोमीटरवर होता. भूकंपाची तीव्रता 3.9 इतकी नोंद झाली आहे. सोमवारी दुपारी दिल्ली आणि एनसीआर प्रदेशात भूकंपाचे झटके बसले होते. त्याची तीव्रता 2.1 इतकी होती. दिल्ली आणि गुरुग्राम परिसरात जमीनीत 18 किलोमीटर खोलवर होता.गेल्या दीड महिन्यात या क्षेत्रात 14 भूकंपाची नोंद झाली आहे. तर याआधी शुक्रवारी झारखंड आणि कर्नाटकमध्येही भूकंपाचे झटके बसले होते. त्याची तीव्रता अनुक्रमे 4.5 व 4 होती असे अधिकाऱयांनी सांगितले.