श्रीनगर / वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरच्या श्रीनगर जिल्हय़ात सुरक्षा दलांनी दोन अज्ञान दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. हे दहशतवादी पाक प्रशिक्षित असावेत, असे अनुमान आहे. दहशतवादी लपलेल्या जागी सैनिकांनी वेढा घालत त्यांची कोंडी केली. दहशतवाद्यांनी गोळीबर करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. तथापि. सुरक्षा सैनिकांनी केलेल्या गोळीबारात ते ठार झाले. त्यांची ओळख पटविण्याचा प्रयत्न सुरू आहे. दहशतवाद्यांना शरण येण्याचे आवाहन केले गेले होते. तथापि, त्यांनी ते जुमानले नाही, अशी माहिती राज्यातील सेनाधिकाऱयांनी दिली.