ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर तेथील दहशतवादी घटनांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाकडून आज लोकसभेत सांगण्यात आले. 2019 मध्ये फेब्रुवारी महिन्यापर्यंत 594, 2020 मध्ये 244 तर 2021 मध्ये 15 दहशतवादी घटना घडल्या आहेत. 2019 मध्ये फेब्रुवारी महिन्यात 157 तर 2020 मध्ये 8 दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सरकारने 42 संघटनांना दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे. बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम 1967 च्या पहिल्या पत्रकात त्यांची नावे सूचीबद्ध करण्यात आली आहेत.