ऑनलाईन टीम / श्रीनगर :
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 हटविल्यानंतर स्थानिक युवकांचे दहशतवादाकडे वळण्याचे प्रमाण 60 टक्क्यांनी घटले आहे, असे सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या अंतर्गत अहवालात म्हटले आहे.
ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारने कलम 370 हटवून जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन केले. त्यानंतर तेथील स्थानिक तरुणांचे दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्याचे प्रमाण घटले आहे. 1 जानेवारी 2019 ते 4 ऑगस्ट 2019 या काळात 105 तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाले होते.
केंद्र सरकारने कलम 370 हटविल्यानंतर 5 ऑगस्ट 2019 ते 26 जानेवारी 2020 या काळात मात्र, जम्मू आणि काश्मीरमधील 28 स्थानिक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे दहशतवादी संघटनांमध्ये सामिल होण्याचे प्रमाण 60 टक्क्यांनी घटले आहे. मात्र, नियंत्रण रेषेवरील घुसखोरीच्या प्रयत्नांमध्ये फारसा बदल झाला नाही, असे सुरक्षा यंत्रणांच्या अंतर्गत अहवलात म्हटले आहे.