ऑनलाईन टीम / जम्मू :
जम्मू संभागमधील कठुआ जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम वेगाने होत आहे. आता कर्मचाऱ्यांना वेतन मिळवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत 30 जूनच्या आधी कोरोना लस टोचून घेणे सक्तीचे केले आहे. जिल्हा विकास आयुक्त राहुल यादव यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार, अशाच कर्मचाऱ्यांना वेतन दिले जाणार आहे, ज्यांनी लस टोचून घेतली आहे. डीडीओला ट्रेजरीमध्ये वेतनाचे बिल सादर करताना असे सर्टिफिकेट द्यावे लागेल की, वेतन अशाच लोकांना जारी केले जाईल ज्यांचे लसीकरण झाले आहे. यासोबतच ट्रेजरीला देखील निर्देश देण्यात आले आहेत की, ज्यांनी सर्टिफिकेट दिले आहे अशीच बिले मंजूर केली जावीत.
- कार्यालयातील कर्मचारी संख्या लवकरच वाढणार
जिल्हा विकास आयुक्तने आदेशमध्ये स्पष्टपणे म्हटले आहे की, सरकारी कार्यालयात आगामी काळात कर्मचाऱ्यांच्या संख्येत वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्यासोबत येणाऱ्या अन्य सहकारी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना 30 जूनपर्यंत लसीकरण करणे अनिवार्य करण्यात आले आहे.