ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी नुकतीच राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी जम्मू-काश्मीरमधील सर्व 20 जिल्ह्यांतील डीसी, एसपी आशा सर्व सरकारी इमारतींवर 15 दिवसात राष्ट्रध्वज फडकवण्याचे निर्देश दिले आहेत.
यापूर्वी जम्मू-काश्मीरच्या संविधानाच्या अनुच्छेद 144 अन्वये लाल झेंडा हा या राज्याचा स्वत:चा झेंडा म्हणून ओळखला जात होता. मात्र, कलम 370 रद्द झाल्यापासून जम्मू-काश्मीरमध्ये फक्त भारताचा तिरंगा ध्वज फडकवला जाईल.
सरकारच्या निर्देशानुसार, अनंतनागच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व सरकारी इमारती आणि कार्यालयांवर राष्ट्रध्वज फडकवण्याचे परिपत्रक जारी केले आहे. जिल्हा माहिती आणि जनसंपर्क केंद्राने सादर केलेल्या माहितीनुसार सर्व जिल्हा, प्रादेशिक, तहसील आणि ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांना या आदेशाचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.