ऑनलाईन टीम / जम्मू :
कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत चालला आहे, मात्र, अजूनही संकट कायम आहे त्यामुळे जम्मू काश्मीर सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार, केंद्र शासित प्रदेशात लॉकडाऊन 31 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आला आहे.
असे असले तरी, इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना आपल्या आई वडिलांच्या परवानगीने शाळेत जाता येणार आहे. यासोबतच सरकारने धार्मिक, राजकीय सभा अशा ठिकाणी केवळ 100 लोकांना उपस्थित राहण्याची मुभा दिली आहे.