एकत्र काम केल्यानेच त्यांचे प्रेम
सांगली / प्रतिनिधी
जयंत पाटील यांच्या बरोबर एकत्र काम केले आहे. त्यामुले त्यांचे प्रेम आहे. या प्रेमाचे रूपांतर सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांच्या विकासामध्ये रूपांतर करू. त्यांच्या उपस्थितीत लवकरच महापालिकेत बैठक घेऊ. शासनाकडे प्रलंबित असलेले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करू, अशी माहिती भाजप जेष्ठ नेते नगरसेवक शेखर इनामदार यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी महापौर सौ. गीता सुतार, उपमहापौर आनंदा देवमाने, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे, माजी स्थायी समिती सभापती संदीप आवटी, नगरसेवक गजानन मगदूम आदी उपस्थित होते. पालकमंत्री जयंत पाटील यांना मिरजेतील एका कार्यक्रमात महापौर गीता सुतार यांनी महापालिकेत लक्ष घालण्याची विनंती केली. त्यावेळी मंत्री पाटील यांनी शेखर इनामदार व मकरंद देशपांडे यांच्याशी आपले विशेष प्रेमाचे संबध आहेत, त्यांनी बोलावले तर पालिकेत जरूर येऊ अशी ग्वाही दिली होती.
पाटील यांच्या या विधानाने भाजप व राष्ट्रवादीत खळबळ उडाली. पुन्हा एकदा बीजेपी म्हणजेच जेजेपी ( जयंत जनता पार्टी ) असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. या पार्श्वभुमीवर बोलताना शेखर इनामदार म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी माझे २००८ पासूनचे संबध आहे. त्यावेळी आम्ही एकत्र काम केले आहे. आजही आमच्यात प्रेमाचे, मित्रत्वाचे संबध आहेत. ते कायम राहतील. मात्र शहराच्या विकासाच्या आड हे संबध येणार नाही. उलट जयंत पाटील यांच्याशी असलेल्या या संबधाचा फायदा विकासासाठीच करून घेऊ. ते पालकमंत्री आहेत. त्यामुळे महापालिकेचे शासनाकडे प्रलंबीत असलेले प्रश्न त्यांच्य ामाध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू. महापूर, कोरोनामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती अतिशय बिकट झाली आहे. त्यामुळे शासनाकडडून जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी जयंत पाटील यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्यांना महापालकेत निमंत्रीत करून त्यांच्या उपस्थितीत शासनाकडील प्रलंबीत कामांचा आढावा व आर्थिक अडचणींबाबत चर्चा करणार असल्याचे इनामदार आहे.