प्रतिनिधी/ रत्नािगरी
जयगडमधील नावेद बोट दुर्घटनेप्रकरणी शनिवारी स्थानिक मच्छीमारांना बोटीचे काही अवशेष हाती लागल़े या अवशेषाची शहानिशा करण्यासाठी मच्छीमार जयगड सागरी पोलीस ठाण्यात घेऊन आल़े दरम्यान, नावेद बोटीबाबत नेमके काय घडले होते, याबाबत अद्यापही गूढ कायम आह़े तसेच 7 खलाशांपैकी केवळ एकाचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला तर अन्यजणांबाबत काहीही समजू शकलेले नाह़ी
26 ऑक्टोबर रोजी 5 खलाशी व 2 तांडेल यांना घेऊन जयगड येथील नावेद ही बोट खोल समुद्रात गेली होत़ी 26 ऑक्टोबरपासून ही बोट गायब आहे. या बोटीवरील एक खलाशी अनिल गोविंद आंबेकर यांचा मृतदेह सापडला होता. जयगड येथील कंपनीची कोळसा घेऊन एक मोठी बोट 26 ऑक्टोबर रोजी समुद्रात गेली होत़ी कंपनीच्या प्लांट हेडच्या म्हणण्यानुसार रात्री काहीतरी घटना घडल्याची माहिती त्यांनी येथील लोकांना दिल्याचे समजते आणि या कंपनीने याबाबत सर्व शासकीय यंत्रणेला ही बोट गायब झाल्याचे कळवले होते. बोटमालकांनी नंतर तक्रार नोंदवली असल्याचे समजते. कोस्टलगार्ड, मत्स्य विभाग, पोलीस यंत्रणा यांना कंपनीकडून अशी माहिती पुढे आली आह़े
जयगड बंदरातून 26 ऑक्टोबर रोजी बेपत्ता झालेल्या नावेद बोटीचा शोध अद्याप लागलेला नाह़ी या बोटीवरील एका खलाशाचा मृतदेह सापडला असून उर्वरित 6 जणांचा कोणताही ठावठिकाणा सापडू शकलेला नाह़ी यामुळे स्थानिक मच्छीमार व ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जयगड येथील बडय़ा कंपनीवर आरोप करण्यास सुरूवात केली आह़े नुकतीच या संदर्भात गुहागर पालशेत, साखरीआगर, जयगड, वरवडे व आजूबाजूच्या परिसरातील मच्छीमारांची बैठक पार पडली होत़ी यावेळी जयगड येथील स्थानिक कंपनीवर बोट दुर्घटनेचा आरोप करण्यात आला होत़ा
या नौकेवर खलाशी व तांडेल दगडू गोविंद नाटेकर, गोकुळ तुकाराम नाटेकर, अनिल गोविंद आंबेकर, सुरेश धाकू कांबळे (सर्व, रा. गुहागर) तालुक्यातील साखरीआगर गावाचे रहिवासी असून दत्तात्रय सुरेश झगडे (रा. अडूर) व अमोल गोविंद जाधव (रा. मासू) असे सहाही खलाशी व तांडेल गुहागर तालुक्यातील आहेत़ या नौकेच्या शोधासाठी याच मालकाच्या दुसऱया बोटीच्या वायरलेसवरून खलाशांशी संपर्क साधला असता आम्ही आता दाभोळच्या उपर आहे, असे सांगितले गेले. मात्र त्यानंतर या बोटीशी कोणताही संपर्क झालेला नाही, असे बोटमालक मुनताह मुहम्मद शरीफ टेमकर यांनी आपल्या जबाबात सांगितले होत़े
अन्य काही माहिती हाती लागण्याची शक्यता
आता बोटीचे काही अवशेष सापडल्याने आता पुढील दिवसात अन्य काही माहिती हाती लागण्याची शक्यता निर्माण झाली आह़े दरम्यान नावेद बोटीबाबत नेमके काय झाले होते, ही बोट कशाप्रकारे बुडाली, याबाबत पुढील दिवसात उलघडा होणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आह़े