प्रतिनिधी / उस्मानाबाद
जलयुक्त राज्यात साठ लाख कामे झाली असून मोठ्या प्रमाणात पाणी साठा होण्यास मदत झाली आहे परंतु याबाबत सातशे तक्रारी असून कामाच्या केवळ अर्धा टक्के तक्रारी आहेत. ही कामे सर्व विभागाच्या माध्यमातून करण्यात यात आली असून माझा आवाज बंद करण्यासाठी जलयुक्त चौकशी ससेमिरा सुरू केला आहे, असा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. मात्र यामुळे माझा आवाज बंद होणार नसून आम्ही काही दिवसात प्रत्येक तालुक्यात जाऊन याबाबत जनतेमध्ये जलयुक्त मुळे झालेला बदल याची जनजागृती करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.
१ लाख २० हजार कोटींचे कर्ज काढतात येते
शरद पवार यांनी या संकटावर मात करण्यासाठी व शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्ज काढण्याचा अतिशय चांगला सल्ला दिला आहे कर्ज काढण्याचे खूप मोठे पाप होते असे नाही तर राज्याला एक लाख वीस हजार कोटींचे कर्ज काढता येते राज्यावर आजघडीला साठ हजार कोटीचे कर्ज झाले असून ते कर्ज घेऊन अडचणी दूर करता येतील असे सांगितले. तसेच शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहण्याऐवजी उगीच बहाने करू नयेत असा टोलाही त्यांनी लगावला.
दिशाभूल करण्यात सत्ताधारी पक्ष तरबेज
सध्या शेतकरी खूप अडचणीत आहेत त्यांना मदतीची आवश्यकता असून यात मला राजकारण करण्यात कोणताही रस नाही संवेदनशीलता दाखवून शेतकऱ्याला काय मदत करता येईल अशी मला आशा आहे केंद्रीय करतून जो हिस्सा मिळतो त्याची माहिती राज्य सरकार देत नाही. जनतेची दिशाभूल करण्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे पक्ष तरबेज असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणाबाजीचे स्मरण
गतवर्षी अशाच प्रकारे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवार यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी २५ हजार रुपये व फळबागांसाठी ५० हजार रुपये मदत सरकारने दिली पाहिजे, अशी मागणी केली होती. त्यावेळी केलेल्या मागणीची क्लिप यावेळी पडद्यावर दाखविण्यात आली.