प्रतिनिधी / कुरुंदवाड
पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी माजी खासदार राजू शेट्टी यांनी सुरू केलेले पंचगंगा परिक्रमा जलसमाधी पदयात्रा रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे येणार असून या पार्श्वभूमीवर येथे पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मंदिर मार्गावर येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रविवारी सकाळी येथील बस स्थानक येथे डीवायएसपी बाबुराव महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस परेड घेण्यात आली यानंतर सर्व पॉईंटवर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान सायंकाळी होणारे जलसमाधी आंदोलनापूर्वी येथील बस स्थानकावर जाहीर सभा होणार आहे. दरम्यान या ठिकाणी आंदोलनाचे प्रमुख राजू शेट्टी यांना स्थानबद्ध करण्यात येणार असल्याची माहिती पुढे येत आहे. या ठिकाणी ते पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 20 पोलीस अधिकारी पाच पोलीस निरीक्षक 350 पोलीस कर्मचारी असतात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कुरुंदवाड घाट रस्त्यावर ब्रॅकेट लावून रस्ता बंद करण्यात आला आहे. स्वागत कमान तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुख्य मंदिर मार्ग आता बंद करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंचगंगा नदीवर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क आहे.