यामुद्रेला रूक्ष मुद्रा असेही म्हटले जातो. ही मुद्रा करण्यासाठी करंगळीचं टोक अंगठय़ाच्या मुळाशी लावून करंगळीवर अंगठा किंचित दाब देऊन ठेवावा.
उरलेली बोटं सहज सरळ ठेवावी. ही मुद्रा 30 ते 40 मिनिटांपर्यंत वाढवत नेऊन नंतर ही मुद्रा करणं पूर्णपणे बंद करावं. या मुद्रेमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं.
जलोदर, हत्तीरोग, छातीत पाणी होणं, शरीरात सूज असेल तर या मुद्रेचा खूप फायदा होतो. जलतत्व वाढल्याने जे रोग होतात त्यावर ही मुद्दा उपयुक्त ठरेल. वारंवार लघवी होत असल्यास या मुद्रेनं फायदा होतो.