प्रतिनिधी/ बेळगाव
राष्ट्रीय ग्रामीण पेय जल (एनआरडीडब्ल्यूपी) या प्रकल्पाचे जल जीवन मिशनमध्ये रुपांतरित करण्यात येणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक घराला नळ जोडणी करून पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. असे जिल्हा पंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी सांगितले आहे.
तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी व पीडीओ यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलत होते. जल जीवन मिशन या योजनेची माहिती देताना डॉ. राजेंद्र पुढे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीला दिवसाला 55 लिटर पाणी पुरविण्यात येणार असून या योजनेसाठी केंद्र सरकारकडून 45 टक्के आणि राज्य सरकारकडून 45 टक्के अनुदान मिळाले आहे. तसेच या योजनेसाठी 10 टक्के अनुदानाची मदत ग्रामस्थांनी करायची आहे.
याकरीता प्रत्येक गावासाठी पाणी पुरवठा योजनेच्या पाणी आणि निर्माल्य विभागाच्या तांत्रिक संबंधिताना साहाय्य करण्यात येणार आहे. या योजनेच्या कृती आराखडय़ास जिल्हास्तरीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पाणी व अभियान समितीने मंजुरी दिली असून राज्यस्तरीय मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
राज्यातील राज्य पाणी व निर्माल्य समितीने मंजूर केलेल्या कामाची अंमलबजावणी व मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक घराला पाणी मिळणे हा आहे. सरकार जल जीवन मिशन अंतर्गत 2020-21 ते 2023-24 पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक घराला 100 टक्के नळ जोडणी करून पाणी पुरवठा करण्याचे ठरविले आहे.
यावेळी उपकार्यनिर्देशक ए. बी. मुळळ्ळी, योजना निर्देशक एम. एन. पाटील, ग्रामीण पिण्याचे पाणी व निर्माल्य विभागाचे बेळगाव चिकोडीचे कार्यनिर्वाहक अभियंते के. एस. असोटी आणि ए. बी. हुलकुंद उपस्थित होते.