ऑनलाईन टीम / जळगाव :
जळगावात कोरोनामुळे 24 तासांत तब्बल 13 जणांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्यातील स्थिती चिंताजनक बनल्याचे दिसत आहे.
जळगाव जिल्ह्यात मागच्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यात नव्याने आणखी 24 जणांची भर पडली असून, 13 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे येथील मृत्यदर वाढल्याचे दिसत आहे. येथील बाधितांची संख्या 762 वर पोहचली आहे.
लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात काहीशी शिथिलता आहे. मात्र, जळगावमधील चालू स्थिती पाहता आणखी दक्षता घ्यावी लागणार आहे. त्यादृष्टीने प्रशासन सतर्क असून, नागरिकांची साथही महत्त्वाची ठरणार आहे.