कुसमळी-उचवडे परिसरातील नागरिक – विद्यार्थीवर्गातून मागणी
वार्ताहर /जांबोटी
जाबोटी-कुसमळी-बेळगाव अशी स्थानिक बससेवा सुरू करावी, अशी मागणी कुसमळी उचवडे परिसरातील नागरिकांमधून व विद्यार्थीवर्गातून होत आहे.
जांबोटी तसेच कुसमळी, उचवडे, सोनारवाडी तसेच किणये आदी गावातून शालेय तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी शेकडो विद्यार्थी पिरनवाडी तसेच बेळगाव या ठिकाणी शिक्षणासाठी जातात. मात्र या विद्यार्थ्यांसाठी अपुरी बससेवा असल्यामुळे विद्यार्थी वर्गांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे.
सध्या बेळगाव-जांबोटी व्हाया चोर्ला-पणजी अशा बऱयाच जलद तसेच लांबपल्ल्याच्या बसेस या मार्गाने नियमित ये-जा करतात. मात्र सदर गाडय़ांना कुसमळी, उचवडे, किणये आदी गावांमध्ये बसथांबा उपलब्ध नसल्यामुळे या गाडय़ा विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कूचकामी ठरल्या
आहेत.
गोव्याला जाणाऱया सर्व जलद बसगाडय़ा केवळ बेळगाव, पिरनवाडी, जांबोटी याच ठिकाणी थांबून प्रवाशी घेत असल्यामुळे कुसमळी उचवडे, किणये येथून बेळगाव अथवा पिरनवाडी या ठिकाणी शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थ्यांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे सध्या बेळगाव-जांबोटी या मार्गावर सकाळी व संध्याकाळी या वेळेस केवळ चिगुळा आणि चिखले या दोन स्थानिक बस गाडय़ा धावतात. मात्र कुसमळी, उचवडे, सोनारवाडी आदी गावातून माध्यमिक शिक्षणासाठी किणये तसेच पिरनवाडी येथे अनेक विद्यार्थी जातात. मात्र जलद गाडय़ांना कुसमळी आणि उचवडे थांबा नसल्यामुळे तसेच विद्यार्थ्यांच्या वेळेत स्थानिक बससेवा उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थी वर्गाला खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. परिणामी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. तसेच बेळगाव येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी जाणाऱया विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयाचे वेळापत्रक वेगवेगळे असल्यामुळे त्यांना वेळेत बसद्वारे महाविद्यालयात पोहचणे अवघड होत असल्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे.
काही जलद बसचे वाहक व चालक पासधारक विद्यार्थ्यांना बसमध्ये प्रवेश देत नसल्यामुळे स्थानिक बसेसची वाट पाहत विद्यार्थ्यांना बेळगाव रेल्वेस्टेशनवर तासान्तास ताटकळत थांबावे लागते. परिणामी सकाळी महाविद्यालयासाठी गेलेले विद्यार्थी रात्री उशिरा घराकडे परतत असल्यामुळे विशेषतः विद्यार्थिनींची मोठय़ा प्रमाणात गैरसोय होत आहे. यासाठी बेळगाव व्हाया किणये, कुसमळी, जांबोटी अशी दिवसातून किमान चार-वेळा स्थानिक बससेवा सुरू करावी, तसेच बेळगावहून चोर्लामार्गे गोव्याला जाणाऱया सर्व जलद बसेसना विद्यार्थ्यांना बस परवाना उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जांबोटी, कुसमळी, किणये परिसरातील पालक वर्गातून होत आहे.
प्रवासी टेंपोदेखील अपुऱया प्रवासी संख्येमुळे बंद
गेल्या दोन वर्षापासून कोरोना यामहामारीमुळे जांबोटी-बेळगाव या मार्गावर धावणारे खासगी प्रवासी टेंपोदेखील अपुऱया प्रवासी संख्येमुळे बंद झाल्यामुळे या भागातील नागरिकांना बेळगावला प्रवास करणे म्हणजे जांबोटी या ठिकाणी येऊनच बस पकडावी लागत असल्यामुळे सर्वसामान्य प्रवाशीवर्गांचे देखील मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत.
यासाठी परिवहन मंडळाच्या बेळगाव विभागिय वरि÷ अधिकाऱयांनी लक्ष घालून जांबोटी-कुसमळी-बेळगाव अशी स्थानिक बससेवा सुरू करावी तसेच सर्व जलद बसगाडय़ांना कुसमळी व किणये येथे बसथांबा उपलब्ध करून द्यावा व बसअभावी होणारी गैरसोय दूर करावी, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा कुसमळी व उचवडे गावच्या नागरिकांनी परिवहन मंडळाला दिला आहे.