वादळी वाऱयामुळे झाडाच्या फांद्या कोसळून वाहतुकीत व्यत्यय : वीजपुरवठाही खंडित
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-ओलमनी परिसरात बुधवारी सायंकाळी मेघगर्जनेसह दमदार वळीव पावसाने झोडपल्यामुळे अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे या परिसरातील वीजपुरवठा देखील खंडित झाल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून या परिसरात ढगाळ वातावरण होते. चार दिवसापूर्वी हलक्मया स्वरूपाचा पाऊस झाल्यामुळे या परिसरात मोठा वळीव पाऊस पडेल अशी शक्मयता वर्तविण्यात येत होती. शिवाय बुधवारी सकाळपासूनच हवेत प्रचंड उष्मा वाढल्यामुळे, दुपारनंतर पावसाचा शिडकावा होईल, अशी शक्मयता होती. अपेक्षेप्रमाणे बुधवारी सायंकाळी पाच वाजता जांबोटी परिसरात मेघगर्जनेसह तसेच विजेच्या लखलखाटासह दमदार वळीव पावसाने या परिसराला झोडपून काढल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. तसेच वादळी वाऱयामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडाच्या फांद्या कोसळून पडल्यामुळे काही प्रमाणात वाहतुकीत व्यत्यय निर्माण झाला होता. त्याचबरोबर वीजवाहिन्यांवर झाडांच्या फांद्या पडल्यामुळे परिसरातील वीजपुरवठा रात्री उशिरापर्यंत गायब झाल्यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागला. पावसामुळे उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला. पावसामुळे हवेतील आर्द्रता कमी झाली असून, वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. हा पाऊस शेतीकामासाठी काही प्रमाणात उपयुक्त ठरला असून पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना प्रारंभ होण्याची शक्मयता आहे. तसेच उन्हामुळे करपून जाणाऱया शेतकऱयांच्या ऊस व मिरची पिकाला काही प्रमाणात जीवदान मिळाले आहे. तसेच आंबा-काजू पिकांच्या फळधारणेसाठी अनुकूल वातावरण निर्माण होण्याची शक्मयता आहे.