ग्रामस्थांचे वन अधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तालुक्यातील जांबोटी गावच्या स्मशानभूमी जागेचा प्रश्न मार्गी लावा, असे निवेदन जांबोटी गावातील जनतेच्यावतीने खानापूरच्या वनक्षेत्र अधिकारी कविता इरगन्नावर यांना देण्यात आले. जांबोटी गावाजवळ महसूल विभागाची जमीन असल्याने त्या गावच्या स्मशानभूमीसाठी वनखात्याजवळील जमिनीशिवाय पर्याय नाही. यामुळे आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी खानापूरच्या वनक्षेत्र अधिकाऱयाशी जांबोटी स्मशानभूमीसंदर्भात चर्चा करून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यातूनच त्यांनी जांबोटीच्या नागरिकांना वनखात्याकडे रितसर निवेदन द्या, मीसुद्धा ही जमीन मिळवण्यासाठी पाठपुरावा करीन, अशी ग्वाही दिली.
यासंदर्भात त्यांनी वनक्षेत्र अधिकाऱयांना तशा सूचनाही केल्या आहेत. यातूनच जांबोटी नागरिकांनी वनक्षेत्र अधिकाऱयांची भेट घेतली. त्यावेळी वनक्षेत्र अधिकाऱयांनी येत्या दोन दिवसात जांबोटीला भेट देवून स्मशानभूमीसाठी योग्य असलेल्या जागेची पाहणी करून मार्ग काढण्याची ग्वाही दिली आहे.
यावेळी त्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात अरुण महाराज, मनोहर डांगे, राजन कोटीभास्कर, मारुती पेडणेकर, मनोहर गोवेकर, दुर्गेश तळवार, गणेश कुलम, महांतेश कल्याणी, गुड्डुसाब टेकडी, दीपक कवठणकर, राजाराम हळदनकर, शशिकांत हळब, संजय मुदगी, सचिन कुडतुडकर, राजन कुडतुडकर, संदीप बिरजे, उल्हास हळदनकर, रमाकांत नाईक, अरुण गावडे यांचा समावेश होता.