गणेशोत्सवात मंडळांकडून श्रींच्या दागिन्यांची सुरक्षा, रोज रात्री 15 ते 20 कार्यकर्त्यांचा खडा पहारा
कोल्हापूर / संग्राम काटकर
राजाराम चौकातील छत्रपती राजाराम चौक मित्र मंडळाच्या गणेश मूर्तीवरील 68 हजारांचे दागिने चोरीला गेल्याचे पाहून कार्यकर्त्यांना धक्काच बसला. दागिने चोरीला जाण्यावरुन नागरिकांकडून केल्या गेलेल्या उलट-सुलट प्रश्नांची उत्तरे देताना कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले. शहरातील मंडळाच्या गणेशमूर्तींचे दागिने चोरीला जाणे, चोरीचा छडा न लागणे हा प्रकार गेल्या काही वर्षांपासून घडत आहे. मात्र असा नामुष्कीजनक प्रकार आपल्या मंडळाच्या वाटÎाला येऊ नये यासाठी शहरातील मंडळे गणेशमूर्तीला घातलेल्या सोन्या-चांदीच्या अलंकारांच्या सुरक्षिततेच्याबाबतीत दक्ष आहेत. रात्रीची आरती झाल्यापासूनच गणेशमूर्तीभोवतीने खडा पाहारा ठेवला जातो. हा पाहारा दुसऱया दिवशी सकाळी 7 वाजपर्यंत डोळ्याला डोळा न लागता कायम असतो. त्यामुळे चोरही पाहारा पाहून पोबारा होत असतील.
गणेशोत्सवासाठी रस्त्यांवर मंडप उभारुन त्यात सोन्या-चांदीपासून तयार केलेल्या किरीटपासून ते अगदी चौरंग, हार, कान, त्रिशूल-कुऱहाड यांसह बऱयाच अलंकारांनी सजवून गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. मंडपाच्या दर्शनीकडून गणेशमूर्तींला घातलेल्या दागिन्यांची श्रीमंती भक्तांना दिसावी म्हणून सुरक्षेचे दार लावले जात नाही. त्यामुळे दागिन्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही सर्वस्वी मंडळांवरच येऊन पडेत. शिवाय दागिने सुरक्षेची जबाबदारी ही सर्वस्वी मंडळाची आहे, अशा आशयाचे पत्रही पोलीस प्रशासनाला द्यावे लागले. पण बरीच मंडळे ते करत नसले तरी दागिन्यांची सुरक्षा मात्र डोळ्यात तेल घालून करत असतात. शिवाय रात्रीच्या पहाऱयात गल्लीपासून ते अगदी दिल्लीपर्यंतच्या गप्पांचा फड रंगत असल्याने रात्र केव्हा सरली हे कार्यकर्त्यांनाच कळत नाही.
राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ
शहरातील नामवंत मंडळांपैकी एक राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळ (राजारामपुरी दुसरी गल्ली) हे एक मंडळ आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भक्त मंडळाच्या गणेशमूर्तींला सोन्या-चांदीचे दागिने अर्पण करताहेत. त्यामुळे एक ते दीड कोटांचे दागिने जमा झाले आहेत. मंडळाची ही एक जबाबदारी म्हणून दागिन्यांच्या सुरक्षेसाठी 15 कार्यकर्ते निवडले आहेत. उत्सवाच्या सांगतेपर्यंत रोज रात्रीपासून सकाळपर्यंत दागिन्यांच्या सुरक्षेची जबाबदारी याच 15 कार्यकर्त्यांवर सोपवली असल्याचे मंडळाचे अध्यक्ष कुमार कोठावळे यांनी सांगितले
.
जय शिवराय तरुण मंडळ
रविवार पेठेतील या मंडळाने गणेशमूर्तीला चांदीच्या दागिन्यांनी सजवण्याची पद्धत 37 वर्षांपूर्वी शहरात रुढ केली. सध्या मंडळाकडे भक्तांनी अर्पण केलेले 65 किलो चांदीचे व 30 तोळे सोन्याचे दागिने आहेत.असे मंडळाचे संस्थापक राजू यादव यांनी सांगितले.
दी गणेश फ्रेंडर्स सर्कल
माळी कॉलनीतील (टाकाळा) दी गणेश फ्रेंडर्स सर्कलकडे (एस. एफ. ग्रुप) 70 ते 80 किलो चांदीचे दागिने आहेत. यापैकी 63 किलोचे दागिने सध्या गणेशमूर्तीला घातले आहेत. या दागिन्यांना थोडाही धक्का लागू नये यासाठी कार्यकर्ते 10 ते 15 रोज रात्रीपासून सकाळपर्यंत आळीपाळी गस्त घालतात. शिवाय या सर्वांना चहा, नाष्टा देण्यासाठी येणारा खर्च मंडळाचे कार्यकर्ते स्वयंस्फुर्तीने करतात, असे अध्यक्ष अमोल वालेकर यांनी सांगितले
राधा-कृष्ण तरुण मंडळ ट्रस्ट, शाहूपुरी
शहरातील शिस्तबद्ध मंडळ म्हणून राधा-कृष्ण तरुण मंडळाचा लौकिक आहे. या मंडळाच्या गणेशमूर्तींवर 50 किलोचे चांदीचे अन् 40 तोळे सोन्याचे दागिने आहेत. या दागिन्यांच्या सुरक्षेसाठी रोज 20 कार्यकर्ते तैनात असतात. या कार्यकर्त्यांना रात्रीच्या वेळी पाणी देण्यापासून ते चहा-नाष्टा देण्यासाठीची जबाबदारी शाहूपुरीतील बरीच कुंटेबे स्वयंस्फुर्तीने स्वीकारुन सुरक्षेच्या कामात अप्रत्यक्षरित्या सहभाग दर्शवतात. त्यामुळे मंडळाला चोरी सारख्या नामुष्कीजनक प्रकाराला सामोरे जावे लागलेले नाही, असे अध्यक्ष कपिल चव्हाण यांनी सांगितले.