शंभूराज देसाई इशारा
प्रतिनिधी/ सातारा
राज्यात दंगली घडवण्याचा जो प्रकार काही दंगेखोरांनी केला. त्यांच्यावर पोलीस विभागाने वॉच ठेवला आहे. त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून कठोर शासन केले जाणार आहे. जाणीवपूर्वक दंगली घडवणाऱयांना सोडणार नसल्याचा इशारा गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांनी माध्यमाशी बोलताना दिला.
यावेळी गृहराज्यमंत्री देसाई म्हणाले, ज्या राज्यात दंगली घवण्यात आल्या असून त्या दंगली आम्ही वेळीच नियत्रंणात आणल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतिरिक्त कुमक ज्या ठिकाणी लागली ती शेजारील जिह्यातील कुमक आम्ही पाठवली आहे. त्या दंगल करणाऱयांना शोधून काढले आहे. त्याच्यावर आम्ही गुन्हे दाखल केले असून दंगेखोरांना आमचा पोलीस विभाग सोडणार नाही. दंगली आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला बिलकुल अपयश आलेले नाही. वरिष्ठ अधिकारी 24 तास फिल्डवर होते वेळेत दंगल नियत्रंणात आणण्याचे काम आमच्या पोलीस दलाने केले आहे. दंगेखोरांना कठोर शासन करणार आहे. जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा शेजारच्या जिह्यामधून अधिक पोलीस फोर्स पाठवून परिस्थिती नियत्रंणात आणली.