लॉकडाऊनचा गैरफायदा घेतल्यास फौजदारी गुन्हा दाखल करणार
प्रतिनिधी / बेळगाव
कोणत्याही वस्तूची एमआरपीपेक्षा अधिक दराने लॉकडाऊन काळात विक्री केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. नुकतीच एका पत्रकाद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.
जिह्यामध्ये 10 मे ते 24 मे पर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. त्यामुळे वस्तू विक्रीवर वेळेचे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्याचा गैरफायदा काही दुकानदार घेत असून कोणीही अशाप्रकारे अधिक दराने विक्री करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे. सध्या सर्वसामान्य जनता विविध अडचणींना तोंड देत आहे. मात्र काही जण सर्वांनाच वेठीस धरण्याचा प्रयत्न करत आहेत. घाऊक व ठोक विपेते अधिक दराने विक्री करत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. मात्र त्याबाबत सरकारने गांभीर्याने घेतले असून कोणत्याही परिस्थिती अधिक दराने विक्री केल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल, असा इशारा जिल्हाधिकाऱयांनी दिला आहे. कोरोनाकाळात जीवनावश्यक वस्तू अधिक दराने विक्री करत आहेत. मागीलवेळी लॉकडाऊन काळात अशा तक्रारी वाढल्या होत्या. यावेळीही काही ठिकाणी असे प्रकार घडत आहेत. जाणूनबुजून मुद्दाम टंचाई निर्माण करणे आणि जनतेला वेठीस धरणे असे प्रकार कोणीही करू नये. साठा करून ठेवणे, जीवनावश्यक वस्तू संपल्या आहेत असे सांगण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ग्राहक अधिक दराने वस्तू खरेदी करताना दिसत आहेत. मात्र अशा अधिक दराने विक्री करणाऱया व्यावसायिकांवर कठोर गुन्हे दाखल करणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी म्हटले आहे.