खानापूर तालुका म. ए. समिती तसेच युवा समितीच्या शिष्टमंडळाला लैला शुगर्स व्यवस्थापनाचे आश्वासन
वार्ताहर /खानापूर
खानापूर लैला शुगर्स साखर कारखान्याला ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱयांची बिले देण्यास गेल्या दोन महिन्यांपासून कारखान्याकडून दिरंगाई झाली आहे. त्यामुळे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱयांनी कारखाना स्थळावर जाऊन शेतकऱयांची बिले तात्काळ देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
या निवेदनात म्हटले आहे की, लैला शुगर्स कारखान्यावर अवलंबून खानापूर तालुक्मयातील जवळपास 8 लाखाहून अधिक शेतकऱयांनी ऊसपीक घेतले आहे. सर्वसामान्य शेतकरी लैला शुगर्स कारखान्याच्या गाळपावर व तेथून मिळणाऱया बिलावर अवलंबून आहेत. पण कारखान्याने केवळ 30 नोव्हेंबरपर्यंतचे शेतकऱयांचे बिल प्रतिटन 2500 रुपये प्रमाणे जमा केल्याचे सांगितले आहे. त्यानंतरची बिले फेब्रुवारी आला तरी देण्यास दिरंगाई होत असल्याने सर्वसामान्य ऊस उत्पादक मेटाकुटीस आला आहे.
गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे शेतकऱयांच्या हातात वार्षिक उत्पन्न नाही. त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे. ऊस तोडणीसाठीदेखील आर्थिक टंचाई निर्माण झाली आहे. व्याजाने किंवा उसनवार करून शेतकरी ऊसतोडणी करत आहेत. परंतु ऊसपुरवठा करून दोन महिने उलटले तरी शेतकऱयांच्या खात्यावर अद्याप पैसे नसल्याने आर्थिक टंचाईला सामोरे जावे लागत आहे. शिवाय ऊसतोडणी केलेल्या खोडावर रासायनिक खते घालण्यासाठी देखील आर्थिक अडचणी निर्माण झाल्याने पुढीलवषी पीक कसे घ्यावे, हा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकरी वर्गाने कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न असून जानेवारी अखेरपर्यंत पुरवठा पेलेल्या शेतकऱयांच्या खात्यावर तात्काळ बिले जमा करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांनी केली.
यावेळी लैला शुगर व्यवस्थापन समितीचे संचालक चांगाप्पा निलजकर, यल्लाप्पा तीरवीर, सुब्राव पाटीलसह संचालकांनी कारखान्याच्या वास्तव परिस्थिती संदर्भात माहिती दिली. परंतु सदर संचालक मंडळाने समर्पक उत्तर न देता आपल्याच अडचणी सांगण्यावर भर दिला. प्रदीर्घ चर्चेनंतर येत्या आठवडाभरात 31 जानेवारीपर्यंतची बिले शेतकऱयांच्या खात्यावर जमा केली जातील, असे ठोस आश्वासन लैला शुगरच्या संचालकांनी दिले.
यावेळी म. ए. युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, कार्याध्यक्ष किरण पाटील, सदानंद पाटील, राजू पाटील, रामचंद्र गावकर, रणजीत पाटील, म. ए. समितीचे कार्याध्यक्ष मारुती परमेकर, कार्यकारिणी सदस्य गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत, सूर्याजी पाटील, संभाजीराव देसाई, पी. एच. पाटील, विजय मादार, कृष्णकांत बिर्जे, प्रभाकर बिर्जे, पुंडलिक पाटील, दत्तू कुटे हे कार्यकर्ते उपस्थित होते.