माणूस म्हटलं की प्रांत – भाषा अशा वादांवर चर्चा जास्त रंगलेली दिसते, पण आपला खेडवळ ठिकाणी वसलेला कोंकण भाग हा महाराष्ट्र,कर्नाटक आणि गोवा राज्यांच्या त्रिभुज सीमेवर सतत आपल्या आनंदात व्यग्र दिसतो. शेतात बैल आणि माणसं हाकल्याशिवाय त्यांच्या पोटाची खळगी भरत नाही, ते पूर्वजांपासून माहीत आहे. तरी देखील तेथील सुख शांती ही त्यांच्या कष्टाळू वृत्तीमुळे व ईश्वरी कृपेमुळे काय कमी नाही. आज आपण खानापूर तालुक्मयातील जामगाव येथे कोकण पद्धतीत साजरा करण्यात येणाऱया होळी (शिमगा) सणाबद्दल थोडी चर्चा करू….
जामगाव सारख्या खेडोपाडय़ात होळी (शिमगा) सण वेगळाच अनुभवता येतो. पण एकतेचे आणि सामाजिक दर्शन घडवणाऱया या सणाचं एक चांगलं असं स्थान निर्माण झालेलं आपण पाहतो, कारण आपल्या कोंकण किनारपट्टीत वसणाऱया गावांचं होळी सणाशी एक वेगळंच असं नातं रूजलेलं आपल्याला पहावयास मिळतं. होळी सण दोन दिवसांवर असताना महाराष्ट्र – गोवा स्थित सर्व जण आपापल्या मायगावी परततात. हुताशनी पौर्णिमेचा दिवस उजाडला की संध्याकाळी 7 च्या सुमारास गावच्या वेशीपाशी एक आंब्याचा किंवा फणसीचा लांबलचक असा खांब आणून त्याला व्यवस्थित आकार दिला जातो. गावच्या वेशीत पुजाऱयाची अर्धांगिनी ओवाळून हळदी कुंकू लावते. त्यानंतर त्या खांबाचे ढोलांच्या ठेक्मयात वाजत गाजत जंगी स्वागत केले जाते, युवा वर्ग तो खांब जोशात झुजवतो. हिरव्यागार आंबोत्या त्या खांबाला बांधल्या जातात. चोहोबाजूने गोलाकार मंडप उभारण्यात येतो. खांब उभारल्यानंतर रात्री 12-1 वाजण्याच्या सुमारास शिमग्याला सुरुवात होते. एका मोठय़ा दणदणीत ढोल,बोब,टाळ (काश्या) यांच्या गजरात ‘गोंधळ घातला हो, देवाच्या दारी हो…’ या गाण्याच्या सुरात गावच्या सर्व देव देवतांना हाक देऊन रामायणातील कथा सांगितल्या जातात.
गावाच्या परंपरेनुसार यानंतरचे 5 दिवस (पाचिक) सर्वांनी अनवाणी राहायचं, कोणाशी बोलताना काही वाईट शब्द वापरू नये असा निर्धार करून धुलीवंदनाची पहाट नव्या निर्धाराने सोनेरी किरणांनी बहरते. गावातील छोटी मंडळी धूलिवंदनाच्या कार्यक्रमाचे चोर होण्यासाठी तयार झालेले असतात. सकाळी लवकर जंगलात जाऊन एक वेगळय़ाच प्रकारच्या फुलांच्या माळा ते स्वतः बनवून मंदिरातील सर्व देवांना वाहून होळीकडे येतात. तिचे दर्शन घेऊन तिला एक माळ आणि आलिंगन देऊन कसब्याच्या होळीला पण भेट देऊन खाली एका शेतात बसून नाष्टा करतात. झाडाच्या फांद्या बारीक करून आपल्या शरीराला बांधून घेतात, तोंडाला कोळशाच्या पुडीचा लेप लावतात. गावकरी होळीचे दर्शन घेऊन नारळ ठेवून उदबत्ती पेटवून तिला ओवाळून आशीर्वाद घेतात. भस्म कपाळी लावतात. दुपारी ठीक 12 च्या सुमारास जेवण वगैरे उरकून परत तयारी सुरू होते ती धूलिवंदनाची. शिमग्याचे प्रमुख ‘जत करी’ आपल्या वेषभूषेत चमकून दिसतात. त्यांना साथ देण्यासाठी त्यांच्यासोबत आणखी चौघेजण असतात. दोन करवल्या व मध्ये माळी. करवल्यांच्या वेषभूषेतही पुरूषच नटलेले असतात. ‘तुळशी वृंदावनी शारदा भवानी’. या गीताची सांगता झाली की सर्व युवा वर्ग ‘शब्बय शब्बय शबय होयय’ म्हणत त्या रामायणातील गीतांचा आवाजाचा थांग पत्तापण लावत नाहीत. अशा प्रकारे नाचत नाचत गावच्या वेशीपाशी असणाऱया मंदिराकडे हा खेळ घेऊन जातात. मंदिरापाशी जाऊन तिथं ‘नमन’ स्वरूपात काही वेळ गीतं सादर केली जातात.
प्रतिष्ठीत मंडळी ह्या नमन कार्यक्रमात व्यग्र असते तर तिकडे चोर म्हणून नटलेल्यांना शोधण्यासाठी युवा वर्ग सज्ज होतो. त्या सर्वांना पकडून त्यांच्या कुटुंबासोबत त्यांचं वास्तव्य असणाऱया स्थळाला नजर कैदेत ठेवलं जातं. ज्या वेळी जतकरी त्यांच्या बोलीतून इशारा देतात त्याच क्षणी चोरांना धडकी भरवणारा एक बंदुकीचा बार दणाणून सोडत त्याची परवानगी युवा वर्गाला देतो. चोरांना गरागर फिरवत त्यांचा जबाब घेण्यासाठी त्यांना जतकऱयांसमोर हजर केलं जातं. जतकारी म्हणजे गोरं सरकार (ब्रिटिश फौज), युवा पिढी म्हणजे गावच्या वतनदाराची फौज..
संध्याकाळी 4 वाजण्याच्या सुमारास त्या सर्व चोर झालेल्या मुलांना घेऊन परत होळी घातलेल्या ठिकाणी त्या रामायणातील उरलेल्या कथा ढोल आणि काश्या(टाळ) यांच्या पद्धतशीर ठेक्मयात सादर करत नाचत येऊन पोहोचतात. व गावातील प्रमुख व्यक्ती त्या सर्वांचं त्या मंडपात पायावर पाणी घालून स्वागत करतो, होळीपाशी नारळ चढवून धुलीवंदनाची सांगता करतो. चव्हाटय़ात आत शिरणारे बोलतात – ‘राम राम गावडय़ामा’, त्यांचं वाक्मय संपता संपता आत चव्हाटय़ात सगळय़ा मंडळींकडून एकच आवाज घुमतो – ‘राम राम’, आत थोडा वेळ विश्रांती घेऊन मग आपापल्या घराकडे निघतात.
त्यानंतर सर्व चोर झालेली मुले जेवण वगैरे गावच्या पुजाऱयाच्या घरी करतात व संपूर्ण गावात प्रत्येकाच्या घरी जातात तिथं त्यांची धार्मिक पद्धतीने पूजा करून त्यांना तांदळाच्या पिठापासून बनविलेले पदार्थ दिले जातात. त्यानंतर संपूर्ण गाव फिरून झाल्यावर त्या सर्व चोरांना (मुलांना) गुडघे टेकून बसविले जाते. त्यांच्या सर्वांच्या एका हातात पांढऱया रंगाचं कापड असलेली काठी आणि दुसऱया हातात बारीक केलेले खोबऱयाचे तुकडे दिलेले असतात.ते त्यांनी गाण्याचं कडवं संपताच बाहेर उडवायचं, त्यांच्या बाजुने गोलाकार हातात टिपऱया प्रमाणे काटय़ा घेऊन उभे राहतात. व जतकरी – ‘आपुल्या चापुल्या।। किरकावळे बोबती।। घर बांधू डोंगरी ।। लांब झाले धारण।।’ हे गीत गातात. त्या ढोलाच्या ठेक्मयात सर्व युवा वर्ग गोलाकार ओळीत नाचतात. पाचही कडवी संपताच फटाक्मयांचा आवाज ऐकताच सर्व चोर आपल्या शरीरावरील सर्व साहित्य टाकून गावच्या वेशिकडे पलायन करतात.त्यांच्या मागोमाग सर्व लोकसुद्धा जातात. त्यानंतर पूर्वीच्या प्रथेनुसार सर्वजण गावात पुन्हा वेशीमधून प्रवेश करताना वेशीत पेटवलेली आग (खर) ओलांडून गावात प्रवेश करतात. वेशीपासून होळीच्या मंडपापर्यंत ‘ह्या वाटेनं कोण देव गेला रे’ ह्या जती (गीत)पासून सुरवात करूत नाचत नाचत मंदिराकडे येतात.(त्याला आपण ’रोमाट’ असं संबोधतो).
रात्री ठीक 8 ते 9 च्या सुमारास रंगमाल कार्यक्रमाची सुरुवात होते. क्षणाचाही विलंब न करता दोघेजण एक 9 वारी साडी आडवी बांधतात जेणेकरून समोर बसलेल्या लोकांना जतकऱयांच्या पाठीमागे ज्यांना नटवत असतात ते दिसू नये. रंगाचे विविध डबे उघडायला सुरवात करतात. आणि दोघे – तिघेजण मंदिराच्या आतील गाभाऱयाच्या पेटीतून 9 वारी साडय़ांचं गाठोळं, त्यातील हार, जटा अशा वेगवेगळय़ा प्रकारच्या वस्तू काढून आणायच्या घाई गडबडीत असतात. तर दोघे तिथं असणारे देव देवतांचे, राक्षसांचे लाकडी मुखवटे घेऊन येतात. रामायणातील गीत गात ‘रगमाल’ला सुरुवात केली जाते. पहिल्यांदा गौरीला (कालिका/काळकी) वंदन करण्यासाठी गीत गातात, त्या ठेक्मयात समोर एक स्त्री पात्र पुरुष नाचतो. ते संपताच एक गणपती बाप्पाचा मुकुट धारण केलेला आणि दोन्ही बाजूला रिद्धीसिद्धीरुपात नृत्य सादर करतात. त्यानंतर एकामागोमाग एक असे सोंग (एक प्रकारची कला) त्या ढोलाच्या तालावर नाचत सादर केली जाते. हा कार्यक्रम पहाटे 2 ते 3 वाजेपर्यंत रंगात आलेला असतो.
होळीच्या तिसऱया दिवशी माठाधिष सारखे महाराज (बावा) होणारी मुले. त्याची वेशभूषा म्हणजे सर्व साधू मंडळीने जणू काय कुंभमेळा उरकून जामगावच गाठलंय. ते सर्व संपूर्ण गावाला वेढा घालून प्रत्येकाच्या घरी जाऊन ‘आम्ही बावा दर्याचे तांदूळ मागतो वर्याचे’ अशा प्रकारची गाणी ढोलाच्या ठेक्मयात गात आपला खेळ सादर करतात. हा संपूर्ण कार्यक्रम झाल्यावर सर्व गावकरी मंडळी व्यस्त असते ती पोटोबा करण्यास. अशा प्रकारे होळी पासून 5 दिवस एका मागो माग एक अशे निघून जातात. आणि पाचव्या दिवशी शिपणी (न्हावण) म्हणून असतात. हा दिवस आम्हा सर्वांना खूप आनंद देऊन जातो. कारण तुमच्या सध्याच्या रंगपंचमीला पाहता, ह्या शिपण्याच्या दिवसाचं महत्त्व आमच्यासाठी खूप काही संदेश देऊन जात.
दररोजच्या नित्याप्रमाणे सर्व महिला वर्ग सकाळी लवकर उठून झाडलोट तसेच सर्व अंगण शेणाने सारवून त्यावर रांगोळी काढतात. त्यानंतर सर्व जण अंघोळ करून मंदिराकडे होळीपाशी जमतात. गावचा पुजारी सकाळी लवकर नदीकडे जाऊन तीर्थ घेऊन येतो व पूजेसाठी तयारी करतो. सर्वांनी आणलेले नारळ होळीसमोर वाहून गाऱहाणं घालतो. त्या नंतर सर्वांना होळी समोरील भस्म लाऊन आशीर्वाद दिला जातो. व एक एक तांब्या ते तीर्थ आणि प्रसाद म्हणून सर्वांना भातापासून बनवलेला एक एक लाडू (म्होवांडी) दिला जातो. त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी जाऊन लोकांना तीर्थ देतात. आणि रात्री रगमाल करून रात जागर केला जातो व शेवटी रामाच्या आरतीने सांगता होते.
असे सार्वजनिक कार्यक्रम गावची एकजुट, आपुलकी टिकून ठेवतात. त्यामुळे सध्याच्या वैज्ञानिक युगात सर्व युवा पिढीने असे पारंपरिक सण टिकवून ठेवणे काळाची गरज आहे.
– अमित कणकुंबकर, जामगाव