रद्दीतून बुद्धीकडे उपक्रमास मदत : नागरिकांनीही मदत करण्याचे आवाहन
प्रतिनिधी /बेळगाव
शांताई वृद्धाश्रमाच्या विद्या आधार अंतर्गत रद्दीतून बुद्धीकडे उपक्रमास जायंट्स मेनच्यावतीने रद्दी संकलित करून देण्यात आली. लोकसहभागातून विविध नव्या कल्पना लढवून निधी संकलन करून नवनवीन योजना राबविणे हे जायंट्स मेनचे वैशिष्टय़ आहे.
शांताई वृद्धाश्रमाच्या विद्याआधारच्या माध्यमातून दरवषी शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क भरण्यात येते यासाठी बेळगाव परिसरातील विविध संस्था आणि नागरिकांच्या सहकार्याने रद्दी संकलित करून ती विकून शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी निधी जमा केला जातो. दरवषी या उपक्रमाला जायंट्स मेन ही संस्था मदत करीत असते.
यावेळी मदन बामणे, विजय बनसुर, प्रेमानंद गुरव, आनंद कुलकर्णी आणि अविनाश पाटील यांनी रद्दी संकलित करण्यासाठी सहकार्य केले.
संकलित रद्दी विद्याआधारचे प्रमुख माजी महापौर विजय मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. यावेळी विजय मोरे यांनी प्रतिवषी रद्दी देणाऱया जायंट्सचे आभार मानले आणि इतरही सामाजिक संघटना आणि नागरिकांनी या उपक्रमाला हातभार लावावा अशी विनंती केली. कपिलेश्वर रोड येथील जायंट्स भवन येथे हा कार्यक्रम पार पडला.