प्रतिनिधी / बेळगाव
शिक्षकी पेशा नोकरी नसून सेवाव्रत आहे. जेव्हा मुले शाळेत दाखल होतात तेव्हा त्यांना आई-वडिलांचे प्रेम द्या, शिक्षण म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्याचा पाया आहे, असे विचार एकनाथ पाटील यांनी मांडले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही शिक्षक दिनानिमित्त ग्रामीण भागात सेवा बजावणाऱया पाच शिक्षकांना जायंट्स आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
एकनाथ पाटील यांनी जायंट्स मेनच्या कार्याचे कौतुक करताना या संघटनेच्या प्रत्येक कार्यात सातत्य असल्याचे सांगितले.
व्यासपीठावर अध्यक्ष संजय पाटील, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष एकनाथ पाटील, स्पे कमिटी सदस्य मोहन कारेकर, माजी अध्यक्ष सुनील भोसले, सचिव विजय बनसूर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत मोहन कारेकर यांनी केले. मान्यवरांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर जायंट्स आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांना शाल, सन्मानचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष सुनील मुतगेकर, उमेश पाटील, अशोक हलगेकर, प्रेमानंद गुरव, राजू बांदिवडेकर, दिगंबर किल्लेकर, अरविंद देशपांडे, गोविंद टक्केकर, भरत गावडे, ईश्वर पाटील, पांडुरंग पालेकर, महेश रेडकर, राजू जैन, राहुल बेलवलकर, आनंद कुलकर्णी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पुंडलिक पावशे यांनी केले.