महागाई कमी करण्यासाठी काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन
प्रतिनिधी / बेळगाव
मंगळवारी सतीश जारकीहोळी यांनी गोकाक, रामदुर्ग तालुक्मयांमध्ये प्रचार केला. कार्यकर्त्यांच्या फौजफाटय़ासह ते मतदारसंघांमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी अनेकांच्या गाठीभेटी घेतल्या. या परिसरात त्यांना सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. भाजपच्या कोणत्याच आश्वासनाला किंवा आमिषाला बळी पडू नका, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आता प्रचारासाठी केवळ दोनच दिवस राहिले आहेत. त्यामुळे प्रचाराला वेग आला आहे. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळी यांनी यापूर्वी दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघांमध्ये प्रचार केला होता. त्यानंतर आता गोकाक, रामदुर्ग, सौंदत्ती या तालुक्मयांकडे त्यांनी अधिक लक्ष दिले आहे. विविध ठिकाणी कॉर्नरसभा घेऊन त्यांनी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे नेते बेळगाव मतदारसंघात दाखल झाले आहेत. त्यांनी भाजपच्या विरोधात जोरदार प्रचार केला आहे. विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, काँग्रेसचे राज्य अध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे यांच्यासह इतर नेते मंडळींनी त्यांच्या विजयासाठी कंबर कसली आहे. पत्रकार परिषदांसह कॉर्नरसभा घेऊन त्यांनी भाजपवर टीका केली. सतीश जारकीहोळी हे निश्चितच विजयी होणार आहेत. त्यामुळे जनतेने त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन काँग्रेसने केले आहे.