ऑनलाईन टीम/तरुण भारत
आता प्रत्येक व्यक्तीकडे स्मार्टफोन आहे. आणि त्या स्मार्टफोन मध्ये दोन तर सिमकार्ड असतातच. तर काहीजणांच्याकडे दोन पेक्षा जास्त सिमकार्ड असतात. दरम्यान, सध्याच्या स्मार्टफोनमध्ये दोन सिमकार्ड राहतील अशी सोय आहे. त्यामुळे प्रत्येकाकडे दोन किंवा त्यापेक्षा अधिक सिमकार्ड असतात. मात्र आता दूरसंचार विभागाने नऊपेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या लोकांचे कनेक्शन तोडण्याचा आदेश जारी केला आहे.
आदेशानुसार, नऊ पेक्षा जास्त सिम असल्यास, सिमकार्डची पडताळणी आणि पडताळणी न झाल्यास तुमचा एक क्रमांक वगळता इतर सर्व क्रमांक बंद केले जातील, असे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भागात राहणाऱ्या लोकांसाठी सहा सिमकार्डची मर्यादा देण्यात आली आहे. यापेक्षा जास्त ठेवल्यास पुन्हा पडताळणी करावी लागेल.