गोडोली / प्रतिनिधी
कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी योग्य वेळी महाराष्ट्राला उध्दव ठाकरे यांच्यासारखे योग्य नेतृत्व मिळाले.त्यांनी सातारच्या जिल्हा कोव्हीड सेंटर उभारण्यास तत्काळ मदत केल्याने अद्ययावत सेंटर उभारणी अल्प काळात झाली. जर प्रत्येकाने काळजी घेतली तर दुसऱ्या लाट येणार नाही, आली तर ती रोखण्यास राज्यातील सर्व यंत्रणा सुसज्ज आहेत.१०० बेडचे नव्याने सुरू होत असलेले जिजामाता कोव्हीड सेंटर सुध्दा सर्वोत्तम तयारीने सुसज्ज असल्याचे प्रतिपादन ना.शंभुराज देसाई यांनी केले.
सातारमध्ये कोडोली येथील कल्याण रिसॉर्ट येथे कल्याण जिजामाता महिला विकास मंडळ संचलित १०० बेडचे सुसज्ज असे जिजामाता कोविड सेंटर उभारले आहे. त्याचे उदघाटन शुक्रवार १३ रोजी वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आणि शिवसेनेचे उपनेते ना.नितीन बानुगडे पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम,जिल्हा प्रमुख यशवंत घाडगे,बंडा कुंभारदरे,मोहन मोरे, जिजामाता संस्थेच्या उपाध्यक्षा शाहिन शेख, प्राजक्ता जाधव,मिनाक्षी मोरे,धनश्री वाघमारे,आदी मान्यवर उपस्थितीत झाले.
जिजामाता कोविड सेंटरच्या उभारणीची मूळ कल्पना नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची असून ती आज पुर्णत्वास आली असल्याचे उद्योजक दीपक गाडे आणि साताऱ्यातील शिवसेनेचे उपशहर प्रमुख शहर निलेश मोरे यांनी या अद्ययावत कोविड सेंटरचे शिवधनुष्य पेलले आहे .नितीन बानुगडे पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना, “राष्ट्रमाता जिजाऊंच्या नावाने सुरू झालेले अद्ययावत कोव्हीड सेंटर असून चुकून दुसरी कोरोनाची लाट आलीच तर रुग्णांना सर्वोत्तम उपचारासाठी सुसज्ज आहे. लवकरच कोरोना संपून सर्व कोव्हीड सेंटर बंद व्हावीत,” असे मत व्यक्त केले.सुत्रसंचालन सुनील मोरे पाटील तर आभार जयवंत मोरे यांनी मानले.