रासायनिक खते आणि विषारी किटनाशके यामुळे दिवसेंदिवस जमिनीची सुपिकता कमी होत आहे. युरियासारख्या खतांचा अतिवापर जमिनीला हानीकारक ठरत आहे. देशभरात अनेक ठिकाणी गेल्या 30 वर्षांत पिकांचे उत्पादन निम्म्यावर आल्याचे आढळून येत आहे. उत्पादन कमी येऊ लागताच अधिक खते घातली जातात. त्यामुळे जमिनी आणि शेतकरी दुष्टचक्रात अडकले आहेत.
जमिनीचा पोत सुधारण्यासाठी वैज्ञानिकांकडून अनेक प्रयोग केले जात आहेत. जिप्सम या भारतात विपुलपणे आढळणाऱया खनिजाचा उपयोग करून जमिनीचा कस वाढविता येतो, असे दिसून आले आहे. त्यामुळे त्यावर उत्तर प्रदेशातील हाथरस येथील प्रयोगशाळेत प्रयोग सुरू आहेत. शेतामध्ये जिप्सम पसरण्यासाठी सरकार शेतकऱयांना 75 टक्के अनुदान देत आहे. अधिक उत्पादनाच्या हव्यासापोटी शेतकरी पोटॅशियम, नायट्रोजन आणि फॉस्फरसयुक्त खतांचा वारेमाप उपयोग करतात. मात्र, सल्फर आणि कॅल्शियम या उपयुक्त खनिजांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे पिकाऊ जमिनीचा समतोल बिघडलेला असून त्यावर जिप्समचा उपाय अतिशय प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे.
जिप्सममध्ये कॅल्शियम आणि सल्फर यांचे प्रमाण मोठे असते. ही खनिजे जमिनीत सहजगत्या शोषली जातात. जिप्समपासून तयार केलेले जिप्सम कॅल्शियम सल्फेट हे खत उपयोगात आणल्यास जमिनीची उत्पादकता 30 ते 40 टक्क्मयांनी वाढल्याचेही पहावयास मिळत आहे. पेरणी करण्यापूर्वी जिप्समचा वापर करणे आवश्यक आहे, असे तज्ञ सांगतात. एका हेक्टरमागे सामान्यतः 15 ते 20 किलो जिप्सम पुरेसे ठरते, असेही आढळून आले आहे.