प्रतिनिधी/ रत्नागिरी
जिल्हयामध्ये विविध मार्गांनी आत्तापर्यंत 4 हजार 887 चाकरमानी दाखल झाले आहेत. यापैंकी 14 चाकरमानी पॉझिटिव्ह आढळले असून त्यांचे संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले आहे. जिल्हयात दाखल 4 हजार 887 चाकरमान्यांपैकी 1 हजार 773 चाकरमान्यांनी दोन्ही डोस घेतले असून 1 हजार 828 चाकरनान्यांनी आरटीपीसीआर चाचणी केल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिल़ी
गणेशोत्सवामध्ये माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहीम राबवण्यात येणार आहे. या कालावधीत आरोग्य पथके घरोघरी जाऊन तपासणी करणार आहेत. जिल्हयामध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता असून रुग्ण संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे गावी येणाऱया चाकरमान्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे. एस्टीने दाखल होणाऱया प्रवाशांची प्रवासी कोठे जाणार, त्याचा संपर्क क्रमांक आदी माहिती एस्टी प्रशासन ठेवणार आहे. खाजगी वाहनांनी दाखल होणारे चाकरमानी कोणत्या मार्गानी आले, त्यांच्यामध्ये काही प्राथमिक लक्षणे आहेत का याबद्दलची माहिती ठेवण्यात येणार आहे. घरोघरी होणाऱया सर्वक्षणामध्ये आरटीपीसीआर व रॅपिड ऍटिजेन टेस्ट व लसीचे दोन डोस न घेतलेल्या चाकरमान्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.
यावेळी जिल्हापोलिस प्रमुख मोहितकुमार गर्ग म्हणाले की, जिल्हयात 114 सार्वजनिक गणेशोत्सव तर 1 लाख 66 हजार खाजगी गणेशोत्सव साजरे करण्यात येणार आहेत. यावेळी मिरवणुका न काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे, याला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 300 जणांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावण्यात आल्या असून 55 जणांना तडिपार करण्यात येणार आहे.
यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसिकर म्हणाले की, महाड ते राजापूर या दरम्यान अपघात झाल्यास 17 ठिकाणी टोईग व्हॅन व ऍम्ब्युलन्स सुसज्ज ठेवण्यात येणार आहेत. महामार्ग विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आदींनी अवघड व अपघात प्रवण ठिकाणांचे सर्वेक्षण केले. अपघात टाळण्यासाठी वाढलेली झाडे तोडण्यात आली आहेत. दिशादर्शक फलक, रिफलेक्टरर्स आदी बसवण्यात आले असून आपत्तीकाळी 2 संपर्क अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
गणपतीपुळ्यात मुखदर्शनाचा लाभ
गणपतीपुळे येथील ग्रामंस्थांना मुखदर्शानाचा लाभ घेता येणार आहे मात्र कोणत्याही ग्रामंस्थांना प्रवेश देण्यात येणार नाही. एका तासाला 25 ग्रामस्थांना दर्शनाची व्यवस्था करण्यात आल्याची बातमी जिल्हाधिकारी डॉ. बि.एन. पाटील यांनी दिली.
कोळकेवाडीतून विसर्ग नाही
अतिवृष्टीमुळे दापोली तालुक्यातील जालगाव येथे चार ते पाच फुट पाणी भरल्याची माहिती मिळत आहे. संगमेश्वर येथे सहा घरांचे अशंत नुकसान झाले असून चिपळूणमध्ये धोका पातळीच्या बाहेर पाणी आले नसून कोळकेवाडी येथील पाण्याचा विसर्ग देखील झालेला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली.