जिल्हाधिकारी कार्यालयात लगबग
प्रतिनिधी/ सातारा
गडचिरोली या जिह्यात सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या मूलभूत योजना पोहचण्यासाठी तसेच लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शांततेत व सुरळीतपणे पार पाडण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी म्हणून शेखर सिंह यांनी बजावली.त्यांची बदली सातायाला झाली असून ते शनिवारी सकाळी 11 वाजता पदभार स्वीकारणार असल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे. सोमवारी पदभार स्वीकारताच येऊ घातलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या अनुषंगाने आढावा घेणार आहेत.जिल्हाधिकारी शेखर सिंह हे आढावा घेणार असल्याने सर्वच विभागात गडबड दिसत होती. काही कर्मचाऱयांनी तर अगोदरच टिपण्या तयार ठेवल्याचे समजते.
सातारचे नवे जिल्हाधिकारी शेखर सिंह हे जाईल तेथे आपला वेगळा ठसा उमटवत असल्याचे दाखले आहेत. सर्व कर्मचाऱयांमध्ये काम करण्याची ऊर्जा आणि चैतन्य निर्माण करतात.त्यामुळे ते 2016 ला सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी असताना त्यांनी जो सर्व कर्मचारी, अधिकारी यांच्यामध्ये कामाचा उत्साह निर्माण केला होता.त्यामुळे राज्यात तो जिल्हा नावारूपाला आला. गडचिरोली जिह्यात बदली म्हणजे शिक्षा असा समज बनला आहे.परंतु तेथे ही जिल्हाधिकारी म्हणून सिंह यांनी चांगली भूमिका पार पाडली. सातारा जिह्याला आजपर्यंत चांगले जिल्हाधिकारी होऊन गेले आहेत.मात्र कर्मचारी व अधिकारी हे जिल्हाधिकारी बदलून गेल्यानंतर सुटकेचा निःश्वास टाकणारे सध्या अनेक कर्मचारी दिसत आहेत.दबक्या आवाजात सुटलो बाबा असे बोलताना दिसत आहेत.तसेच नव्याने येणारे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या कामकाजाबाबत काही कर्मचारी व अधिकारी यांना माहिती आहे.त्यामुळे त्यांच्यात चैतन्य निर्माण झाले आहे.ते शनिवारी सकाळी साडे दहा वाजता पदभार स्वीकारणार आहेत अशी खात्रीपूर्वक माहिती आहे.त्याबाबत माहिती घेण्यासाठी त्यांना मोबाईलवर साधला होता परंतु बराच वेळ व्यस्त लागल्याने संपर्क होऊ शकला नाही.मात्र, जिल्हाधिकारी हे पदभार स्वीकारणार असल्याने कार्यलयातील पुरवठा विभाग, गौण खनिज, संजय गांधी निराधार विभाग, नियोजन विभाग यासह बहुतांशी सर्व विभागात माहिती संकलित करण्याची धांदल सुरू होती.जिल्हा नियोजन समितीची कधी ही येत्या आठवडय़ात सभा होण्याची शक्यता आहे.त्याच अनुषंगाने ते शनिवारी दिवसभर बैठक घेणार असल्याचे समजते.तसेच जिह्यातील ज्या ज्या समस्या आहेत. एका बाजूला दुष्काळ तर दुस्रया बाजूला अति पावसाचा भाग तसेच यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जे बाधित शेतकरी आहेत त्यांना अजून ही मदत मिळाली नाही, तो ही मुद्दा नियोजन समितीत निघण्याची शक्यता आहे.तत्पूर्वी खबरदारी म्हणून अधिकायांची समन्वय बैठक जिल्हाधिकारी शेखर सिंह हे घेणार असल्याचे खात्रीपूर्वक माहिती आहे.
सर्वसामान्य नागरिकांसाठी असणार दारे खुले
तत्कालीन जिल्हाधिकारी कडू-पाटील यांच्या कार्यकाळात पत्रकारांचे जिव्हाळ्याचे संबंध होते.त्यांच्या नंतर विकास देशमुख, डॉ.रामस्वामी, अश्विन मुदगल यांच्या ही कार्यकाळात जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले इतर अधिकारी हे पत्रकार व सर्वसामान्य नागरिक यांच्याशी नाळ जोडलेले होते. मात्र, काही अधिकारी हे नागरिकांना भेटायचे टाळतात.पत्रकारांची त्यांना ऍलर्जी असल्याचे प्रकार गेल्या तीन वर्षात अनेकदा घडले गेले आहेत. मात्र,सध्याचे जिल्हाधिकारी सिंह यांचे कामकाज चांगले असल्याने जे तुसाड अधिकारी व कर्मचारी आहेत त्यांना नक्कीच लगाम बसेल अशी ही चर्चा आहे.