म्हणे ऑफिसला येवून माहिती घ्या
प्रतिनिधी/ सातारा
शहरालगतच्या असलेल्या शाहुपूरीतील वाढती लोकसंख्या अपेक्षित धरुन गत पाच ते सहा वर्षापूर्वी नीम शहरी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर करुन आणली. त्याचे कामही सुरु झाले. परंतु त्या योजनेकरता एक्सप्रेस फिडरची लाईटच नव्हती. त्यामुळे सगळा खोळंबा झाला होता. आता त्या कामांकरिता विद्युत वाहिनी टाकण्याचे काम वेगाने सुरु आहे. याच कामाची माहिती घेण्याकरिता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अभियंता श्रीमती चौगले मोटे यांना संपर्क साधला असता कार्यालयातच या असा हट्ट धरला असून त्यांनी. जिल्हाधिकारीसाहेब तुम्हीच ह्या मॅडमना जरा सोशल डिस्टन्स शिकवा, अशी मागणी होवू लागली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात नेमका काय कारभार सुरु आहे. त्याचे सर्व पत्ते तरुण भारतकडे आहेत. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयास विनाकारण त्रास नको म्हणून लक्ष घातले जात नाही. शाहुपूरीतील योजनेची शासकीय माहिती विचारली असता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अभियंता श्रीमती मोटे यांना माहिती तशी देता येत नाही. तुम्ही कार्यालयात या अन् माझ्याकडूनच घ्या, असा हिय्या पुरवला गेला आहे. वास्तविक सध्या कोरोना वाढत आहे. कोरोनाच्या अनुषंगाने लांबूनच किंवा ऑनलाईनच माहिती दिली जाते. फोनवरुन माहिती देंणे गैर काय आहे. असे असताना जिल्हाधिकारी व प्रशासनाच्या नियमालाच हरताळ फासण्यात येत आहे. शाहुपूरीमध्ये नुकताच खासदार उदयनराजे यांच्या हस्ते एक्सप्रेस फिडरच्या कामाचा शुभारंभ झाला. परंतु हे काम कसे होत आहे त्याबाबत मात्र जीवन प्राधिकरणाकडून बोटचेपी भूमिका घेतली जात आहे. सुमारे सहा वर्षापूर्वी शाहूपूरी लगतच्या भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी वाढीव पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. कामाला सुरुवातही झाली. हे काम ठेकेदार दीपक धिवरे याच्याकडे आहे. सुरुवातीपासून हा ठेकेदार वादातित राहिलेला आहे. आताही त्यानेच वायरिंगचे काम हाती घेतले आहे. ही योजना 34 कोटी 50 लाख रुपयांची होती. परंतु त्या कामामध्ये अनेक बदल झाल्याने 12 कोटी वाढीव निधी करयात आला. त्यास मंजूरीही देण्यात आली. हे काम पूर्ण झाल्यानंतर नजिकच्या 25 हजार नागरिकांना पाण्याचा पुरवठा होणार आहे, अशी माहिती जीवन प्राधिकरण कार्यालयातूनच देण्यात आली.