प्रतिनिधी / बेंगळूर
ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या जाणून त्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने प्रत्येक महिन्याच्या तिसऱया शनिवारी जिल्हाधिकाऱयांनी खेडय़ांमध्ये वास्तव्य करावे, असा आदेश दिला होता. मात्र, राज्यात कोरोनाचा मोठय़ा प्रमाणात फैलाव होत असल्याने सर्व जिल्हाधिकाऱयांचे ‘ग्रामवास्तव्य’ रद्द करण्यात आले आहे.
महसूल खात्याचे मुख्य सचिव एन. मंजुनाथ प्रसाद यांनी सर्व प्रादेशिक आयुक्त व जिल्हाधिकाऱयांना हा आदेश दिला आहे. यापूर्वी राज्यातील 10 जिल्हय़ांमध्ये पुढील आदेशापर्यंत ग्रामवास्तव्य आयोजित करू नयेत, अशी सूचना देण्यात आली होती. आता राज्यातील सर्व जिल्हय़ांमधील ग्रामवास्तव्य रद्द करण्यासंबंधीचा आदेश जारी करण्यात आला आहे.