सर्वांनीच कोरोना लस घेण्याचे केले आवाहन
बेळगाव : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. कोरोनाबाबतची लस उपलब्ध झाल्यानंतर तातडीने ही लस प्रत्येकाने घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी केले आहे. दुसरा डोस वंटमुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हाधिकाऱयांनी घेतला. त्यानंतर त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. जिल्हाधिकाऱयांनी कारवार येथे पहिल्या टप्प्यातील डोस घेतला होता. त्यानंतर आता आठ आठवडय़ांनंतर बेळगाव येथे दुसऱया टप्प्यातील डोस घेतला आहे. लसीकरण झाल्यानंतर कोणतेही दुष्परिणाम शरीरावर होत नाहीत. तेव्हा नागरिकांनी मोठय़ा उत्साहाने आणि धाडसाने ही लस घ्यावी, असे त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हय़ात लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. कोणताही तुटवडा भासणार नाही. सध्या दररोज 30 हजार नागरिकांना लस देण्यात येत असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. लसीबाबत कोणताही संशय मनात न बाळगता पुढे यावे. कारण लस घेतल्यानंतर कोरोनाची लागण होण्याची शक्मयता कमी असते, असे त्यांनी सांगितले. कोरोनापासून बचाव करण्यासाठी घातलेले नियम प्रत्येकाने पाळावेत. अजूनही बरेच जण विनामास्क फिरताना दिसत आहेत, ही बाब गंभीर आहे. सध्या बेंगळूर, त्याचबरोबर महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आपण याबाबत खबरदारी घेणे जरुरीचे आहे. तेव्हा जनतेने कोरोनाबाबतची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी स्पष्ट केले. डोस घेताना त्यांच्यासोबत जिल्हा आरोग्याधिकारी शशिकांत मुन्याळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.